• Sat. Sep 21st, 2024
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार, प्रत्येक गाण्यावर…; माजी पोलीस अधिकाऱ्याची मोठी मागणी

सोलापूर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलमुळे महाराष्ट्रात रोजच कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ लागला आहे. एखाद्या मैदानात गौतमी पाटीलचं कार्यक्रम घेतला असता, त्या ठिकाणी गर्दी अनियंत्रित असते. तसेच डान्स करताना तिचे हावभाव, अश्लिल इशारे हे भारतीय पिनल कोडचे उल्लंघन आहे, अशी माहिती माजी पोलीस अधिकारी व बार्शी तालुक्यातील शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली. यावेळी त्यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी आणली पाहिजे अशी मागणी केली आहे.नृत्यांगना गौतमी पाटील हिचे डान्स करणे हे उपजीविकेचे साधन असेल. मी त्या माय माऊलीच्या विरोधात नाही. पण सार्वजनिक ठिकाणी अनियंत्रित गर्दी जमविणे आणि स्टेजवर अपुरे कपडे घालणे, अंगविक्षेप करत असभ्य चाळे करणे, युवक मंडळीच्या कानात अश्लील शब्द पडणे यावर मुंबई पोलीस कलम ११०/११२, ११७ तसेच इंडियन पिनल कोड २९४ प्रमाणे गुन्हा नोंद झाला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Sameer Wankhede : आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंची ५ तास चौकशी, हे १५ प्रश्न विचारून CBI ने घेरलं…

गौतमीच्या कार्यक्रमांवर रोज गुन्हा दाखल होणे गरजेचे…

नृत्यांगना गौतमी पाटीलचे कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात संपन्न होत आहेत. एखाद्या मैदानात हे कार्यक्रम होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सर्रास अश्लील चाळे सुरू आहेत. असभ्य चाळे करणे, युवक मंडळीच्या कानी पडतील असे घाणेरडे शब्द वापरणे, हावभाव करणे हे सर्व कायदेशीर कलमान्वये गुन्हे आहेत. असे प्रकार सर्वसामान्य जनतेसमोर सार्वजनिक ठिकाणी केले जात असतील तर गौतमीच्या रोज होणाऱ्या कार्यक्रमांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. कपडे घालण्यामध्ये कायद्याने बंधनं लादली आहेत. कुणाला भुलवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळे इशारे करणं, अंगविक्षेप करणं, हावभाव करणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे अशी माहिती माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी माहिती दिली.

धक्कादायक! इमारतीच्या फ्लॅटमधून पोलिसांना मिस्ड कॉल, सिग्नल मिळताच टाकला छापा; २ महिला अन्…

महाराष्ट्र शासनाने दखल घेत बंधनं घातली पाहिजे…

गौतमीच्या कार्यक्रमात येणारे युवक या ठिकाणी जे व्हिडिओ शेअर करत असतात ते त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु जरा जपून करा असा सल्ला आंधळकर यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्यात हे असंच चालू राहिलं तर कायदा सुव्यवस्था निर्माण होईल. काही वेळेला दंगल घडेल, हाणामाऱ्या-मारामाऱ्या, खुनाचे प्रयत्न किंवा खून होतील. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. ३४ वर्ष पोलीस खात्यात आम्ही सेवा केलेली आहे. याप्रमाणे १०१% गुन्हे होत आहेत. रोज राडे होत आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम हा गुन्हा होत आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने आणि महाराष्ट्र शासनाने याची नोंद घ्यावी अशी विनंती आंधळालकर यांनी केली आहे.

Gautami Patil: गौतमी पाटीलचा कार्यक्रम अन् राडा या समीकरणाला ब्रेक लागणार, पोलिसांची नवी आयडिया आणि…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed