• Thu. Mar 12th, 2026

    सांगलीत भीषण अपघात; ट्रॅक्टरने दिली कारला धडक, एकाच कुटुंबातील ५ जण गेले, एकूण ६ मृत्युमुखी

    सांगलीत भीषण अपघात; ट्रॅक्टरने दिली कारला धडक, एकाच कुटुंबातील ५ जण गेले, एकूण ६ मृत्युमुखी

    सांगली : मिरज येथील वड्डी येथील नागपूर-रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. ज्या महामार्गावरून ही अपघाग्रस्त गाडी धावली, तो महामार्ग दोन दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, आणि अवघ्या दोन दिवसात महामार्गावर सहा जण ठार झाले.नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग जवळपास पूर्ण होत आला आहे. कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने अर्थात नागपूरकडे जाण्यासाठी आतापर्यंत मिरज शहरामधूनच वाहनांना जावं लागत असे. यामुळे मिरज शहरावर या वाहतुकीचा मोठा ताण पडतो. नागपूर- रत्नागिरी महामार्ग बनवताना मिरज शहराला बायपास करून तो महामार्ग निर्माण करण्यात आला. यामुळे कोल्हापूरहुन पंढरपूरकडे जाणारी सर्व वाहने मिरज शहराच्या बाहेरून तानंग फाटा येथे आता थेट पोहचत आहेत. यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनधारकांचा त्रास आणि वेळ वाचत आहे.

    PBKS vs DC: अप्रतिम, अफलातून, कल्पनेपलिकडचे,धवनची कमाल, हवेत उडी मारत पकडला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ
    दोन दिवसांपर्यंत या मार्गाचं काम सुरू होतं. काम पूर्ण झाल्यावर दोन दिवसांपूर्वीच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि या खुला झालेल्या महामार्गावरून पंढरपूरकडे जाण्याचा निर्णय पंढरपूरला निघालेल्या पोवार कुटुंबाच्या गाडीच्या चालकाने देखील घेतला. मात्र ज्या ठिकाणाहून हा बायपास मार्ग सुरू होतो, तेथून काही अंतर गेल्यावर पोवार कुटुंबांच्या गाडीला भीषण अपघात झाला.

    चुकीच्या दिशेने समोरून येणाऱ्या विटीने भरलेल्या ट्रॅक्टरला जाऊन पोवार कुटुंबांची गाडी धडकली. ज्यामध्ये गाडीमध्ये असणारे पोवार कुटुंबातील पती-पत्नी,मुलगा आणि सासू व चुलत सासरे,असे पाच जण ठार झाले आहेत.

    Pune News: १७ वर्षीय मुलाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू, कुटुंबीयांचा प्रशासनावर गंभीर आरोप
    जयवंत दत्तात्रय पोवार (वय ४५) ,स्नेहल जयवंत पोवार (वय ४०),सोहम जयवंत पोवार (वय-१२), लक्ष्मण शंकर शिंदे (वय-७०), कमल श्रीकांत शिंदे (वय ५६) आणि ड्रायव्हर उमेश उदय शर्मा (वय २२)अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर साक्षी जयवंत पोवार (वय १५) आणि श्रावणी जयवंत पोवार (वय-१७) या दोघी बहिणी सुदैवाने या भीषण अपघातातून बचावल्या आहेत. त्यांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    बँकेच्या त्या निर्णयाने शेतकऱ्याला बसला मोठा धक्का, शेवटी व्हायला नको तेच घडले, सारेच संपले
    अपघाताची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या अपघात प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी अविनाश कोळी या चालकास अटक करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed