• Sat. Sep 21st, 2024

‘सर्वोच्च’ निकाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा; उद्धव ठाकरेंची पक्षाचे आमदार अन् नेत्यांना सूचना

‘सर्वोच्च’ निकाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा; उद्धव ठाकरेंची पक्षाचे आमदार अन् नेत्यांना सूचना

Uddhav Thackeray : भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे, हे लोकांना आवडलेले नाही. कर्नाटकातून घालवले, आता महाराष्ट्रातूनही घालवू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.

 

Abolish guv's post or set up system of appointment_ Uddhav; slams Narwekar.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच पक्षाच्या आमदार आणि नेत्यांशी शनिवारी संवाद साधला. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह कर्नाटक निवडणुकीच्या निकालावरही चर्चा करण्यात आली.सत्तासंघर्षाचा निकाल आपल्या बाजूने लागला असून तो आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी नेतेमंडळी आणि आमदारांना केली. तर, कर्नाटकमध्ये भाजपला घालवले असून आता महाराष्ट्रातून घालवू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असणार यावर चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्व आमदारांना समजावून सांगण्यात आला. हा निकाल आपल्या बाजूने कसा आहे हे स्पष्ट करण्यात आले.

Uddhav Thackeray: आरपारची लढाई होऊन जाऊ दे, जनताच आपला फैसला करेल; उद्धव ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांना ओपन चॅलेंज
‘आता हा निकाल लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. लोकांना समजावून सांगितले पाहिजे. म्हणजे लोकांचा या निकालावरील विश्वास वाढेल’, असे उद्धव ठाकरे यांनी आमदारांना सांगितले. तसेच पुढील आठवड्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यांनाही असेच आदेश दिले जातील.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed