• Fri. Mar 13th, 2026
    प्रकाश आंबेडकर झाले खुश, एक रुपयाही खर्च न करता झालेल्या सरपंचाला बाईक गिफ्ट

    अकोला: ना पक्क घरं, ना घरात वीज, बँकेत खातं आहे, पण त्यात रक्कम नाहीये, ना संसार, रेशन कार्डावरही फक्त एकटेच. इतर खर्च करण्याचीही परिस्थिती नसताना ग्रामस्थांनी सरपंचपदासाठी उभे केले, वंचित बहुजन आघाडीकडून सरपंच पदाकरीता उमेदवारी जाहीर झाली अन् निवडून येत ग्रामपंचायतीची सत्ता मिळवली. हा प्रकार आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आकोलखेड गावातील. हे सरपंच आहेत दिगंबर पिंप्राळे. सरपंच अजूनही गावात पायी फिरत असल्याचं समजलं आणि त्यांची हलाखाची परिस्थिती पाहून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरपंच पिंप्राळेंना भन्नाट गिफ्ट दिलं. हे गिफ्ट पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.अकोला जिल्ह्यात मागील वर्षी २५८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आकोलखेड ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामस्थांनी अशा उमेदवाराला सरपंच पदासाठी उभे केले, की त्याबद्दल तुम्ही ऐकूनही थक्क व्हाल. दिगंबर पिंप्राळे असं उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव.

    त्यांचं बॅकग्राऊंड म्हणजे ना त्याच्याकडे पक्क घरं, ना त्या घरात लाईट, बँक खाते आहे पण त्यात रक्कम नाहीये, ना आई-वडील, ना पत्नी-मूलबाळ. राशन कार्ड आहे पण त्यातही फक्त एकटेच. इकतेच नव्हे तर बदलत्या युगात त्यांच्याकडे स्मार्टफोन नसून साधा फोन आहे. तसेच इतर खर्च करण्याचीही परिस्थिती नाही. अशा परिस्थितीत ग्रामस्थांनी त्यांना सरपंच पदासाठी उभं केलं, वंचितनेही त्यांना पाठिंबा दिला. अन् गावकऱ्यांनी सरपंच निवडणुकीत निवडूनही आणले आणि थेट ग्रामपंचायतीची सत्ता मिळवून दिली. दरम्यान आठ हजारहून अधिक लोकसंख्या असलेले हे आकोलखेड गाव आहे.

    प्रकाश आंबेडकरांनी सरपंचला दिली अनोखी भेट

    पिंप्राळे घरदार वीज नसणारे एकमेव सरपंच, थेट जनतेतून निवडून येऊन सरपंच पदापर्यंत पोहचणारे पिंप्राळे यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे वाहन नव्हते. ते नेहमी पायी प्रवास करीत होते. परंतु वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त सरपंच दिगंबर पिंप्राळे दुचाकी भेट दिलीय. आज सकाळी आंबेडकरांनी आपल्या हातानं चावी देऊन त्यांना दुचाकी भेट दिली आहे. या अनोख्या भेटीमुळे सरपंचाच्या चेहऱ्यावर आनंद चांगलाच फुलला आहे. यावेळी ओबीसी नेते बालमुकुंद भिरड, गोपाल राऊत, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवेसह इतर लोक उपस्थित होते.

    Beed Temple Gold Tortoise : महादेवाच्या पिंडीखाली सापडला सातशे वर्ष जुना खजिना, जीर्णोद्धारावेळी भक्तांचे डोळे चकाकले

    एक रुपयाही खर्च न करता झाले होते सरपंच

    निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी उभ्या असलेल्या सदस्यांनी पिंप्राळे यांचा प्रचार फलकावर फोटो लावला आणि त्यातून त्यांचा प्रचार झालाय. दरम्यान मागील २० डिसेंबर रोजी हाती आलेल्या निकालानंतर वंचितकडून दिगंबर पिंप्राळे यांनी सेनेच्या रत्नप्रभा निचळ यांचा ४४३ मतांनी पराभव केला. दिगंबर पिंप्राळे यांनी एक रुपया देखील खर्च न करता दिग्गजांना पराभूत केले. वंचितच्या दिगंबर पिंप्राळे यांना १ हजार ८९२ मते तर सेनेच्या रत्नप्रभा निचळ यांना १ हजार ४४९ मतांवर समाधान मानावे लागले.

    मुलीच्या जन्मानंतर नाकं मुरडणाऱ्यांनो, लेकीचं स्वागत असं कराचयं असतं…!

    तेव्हा बहुजन पॅनलचा १० जागांवर विजय

    अकोलखेड ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन पॅनल विरुद्ध विकास पॅनल अशी थेट लढत होती. विकास पॅनलची एक जागा अविरोध झाल्याने १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये १२ सदस्य पदाकरिता निवडणूक झाली. बहुजन पॅनलचे १२ विरुद्ध विकास पॅनलचे १२ व ५ अपक्ष असे एकूण २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बहुजन पॅनलला दहा जागा मिळाल्या, तर विकास पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

    जिवा महालांच्या वंशजाला मिसेस मुख्यमंत्र्यांची मदत, प्रतीक्षा महालेंच्या लग्नासाठी धनादेश

    लग्न झाले मात्र एका वर्षातच घटस्फोट

    दिगंबर पिंप्राळे यांचा १९९६ मध्ये विवाह झाला आणि विवाह नंतर एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यात आई-वडिलांचे निधन झाले. त्यामुळ पिंप्राळे यांनी दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही. सध्या ते घरात एकटेच सदस्य आहेत. त्यांच्याकडे राशन कार्ड आहे पण त्यामध्ये त्यांचं एकट्याचं नाव आहे. त्यात पूर्णतः भूमीहीन. दरम्यान त्यांना २०२१ मध्ये घरकुल मंजूर झालं असून त्याचं बांधकाम अजून प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत त्यांना उमेदवारी जाहीर झाली. अन् निवडून आले. पिंप्राळे हे घर, दार, वीज नसलेले महाराष्ट्रातील कदाचित एकमेव उमेदवार असावेत. एक सर्वसामान्य माणूस ते थेट गावचे जनतेच्या मनातील सरपंच पदापर्यंत ते आपल्या कर्तृत्वावर व गोरगरीबांचे अडलेली कामे करून, त्यांना सहकार्य करून पोहोचले आहेत. अतिशय साधी राहणी व उच्च विचार, सतत दुसऱ्यांना मदत करण्याची त्यांची वृत्तीमुळेच ते यशस्वी झाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed