थोडा वेळ रुपाली यांना बरेही वाटले मात्र सकाळी उठल्यानंतर त्यांना पुन्हा उलट्या मळमळ चक्कर सुरू झाल्याने घरच्यांनी सकाळी १०.३० वाजता तात्काळ रिक्षा करून रूपाली यांना शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले. या ठिकाणी पोहाचण्या आधीच रूपाली यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे यांनी महिलेचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाले होणार सदर मृत्यू उष्माघातानेच झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत अमळनेर पोलिसात महिलेचे दीर दीपक राजपुत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. मयत रुपाली यांच्या पश्चात पती, सासू सासरे, दीर असा परिवार आहे. गजेंद्र उर्फ अतुल मंगलसिंग राजपूत यांच्या त्या पत्नी तर मंगलसिंग राजपूत यांच्या मोठ्या सून होत्या.
राज्यात जळगाव जिल्हा सर्वाधिक उष्ण
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. सलग तीन दिवस जळगाव जिल्हा हा उष्णतेच्या बाबतीत देशात पहिला क्रमांक होता. गेले तीन दिवस जळगावात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. शुक्रवारीही जळगाव येथे ४५.८ डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. सध्या तरी राज्यात तापमानाच्या बाबतीत जळगाव जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, आवश्यकता नसल्यास बाहेर फिरणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.