• Sat. Sep 21st, 2024
मतदारांनी दोन्ही गटांना खडे बोल सुनावले; मतमोजणीवेळी सापडलेल्या चिठ्ठ्यांमध्ये नेमकं काय?

कोल्हापूर:कोल्हापुरात श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यामध्ये महाडिक गटानं पुन्हा एकदा कारखान्यावर वर्चस्व मिळाल्याचं चित्र आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसात महाडिक गटाकडून आणि सतेज पाटील गटाकडून करण्यात आलेलं शक्ती प्रदर्शन आणि एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर जाऊन केलेली टीका टिप्पणी ही मतदार राजाला पटलेली नसल्याचे चित्र समोर येत आहे. मतदार राजाने मतासोबतच मत पेटीमध्ये चिठ्ठ्या लिहून आपले मत व्यक्त करत दोन्ही नेत्यांनाही खडे बोल सुनावले आहेत.

मतदार पेटीतील चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय:

आज सकाळी आठ वाजता कोल्हापुरातील कसबा बावडा येथील रमण मळा मधील बहुउद्देशीय हॉल येथे श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू करण्यात आली. दोन्ही गटाकडून मतदाररांना वाटण्यात आलेले पैसे तसेच एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर जाऊन केलेली टीका हे मतदारांना आवडली नसल्याचे चिट्ट्यांमधून समोर आले आहे. तर काही मतदारांनी माजी चेअरमन सर्जेराव माने यांच्यावर निशाणा साधत हा दल बदलू आणि रंग बदलू सरडा असून सर्वजण आपल्या स्वार्थासाठी पार्टी बदलू आहेत अशांना पुढे निवडून देणार नाही आणि चेअरमन ही होऊ देणार नाही, असे म्हणत जोरदार टीका केली आहे.

मतदारांनी काय म्हटलं?

१. एका चिठ्ठी मध्ये मतदाराने दोघांनाही खडे बोल सुनावत निष्ठा प्रामाणिकपणाला फाट्यावर मारत नोटांच्या गठ्ठ्यावर मतदान होत आहे. कोणी दहा तर कोणी पाच हजार किती वाटले. महाडिक साहेब आणि बंटी साहेब लोकांच्या ईर्ष्येपायी कसला नि कुठला पायंडा पडतोय याचा यापुढे तरी सर्वांनी विचार करा. सभासदांना मताचे मोल घेताना होत आहेत गुदगुल्या निवडणुकीनंतर कामासाठी नेत्यांपुढं जाताना काढाव्या लागतील नाकदुऱ्या असे एका मतदाराने लिहिले आहे.

खरी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणती? कोल्हापूरमध्ये आजपासून होणारी स्पर्धा वादात

२. तर दुसऱ्या मतदाराने आज रोजी चालू असलेल्या निवडणूक व त्यामध्ये असलेली प्रतिष्ठा पणाला लावून वारे माप खर्च करण्यात येत आहे. मग, हा खर्च कुठून वसूल करणार हे समजत नाही. आम्ही सभासदांनी कोणावर विश्वास ठेवावा हा चिंतेचा विषय बनला असून आम्हाला एकच अपेक्षा आहे तुम्ही पैकी कोणीही सत्तेत आला तरी इथेनॉल को जनरेशन अशा विविध योजना चालू करून पाच ते सात हजार रुपये असा सभासदांना चांगला दर देता येईल का हे पहावे. बाकी तुम्ही दोघांचे आरोप प्रत्यारोप यामध्ये आम्हा सामान्य नागरिकाला कोणतेही रुची नाही. एक गरीब सभासद असे लिहिले आहे.

पराभव मोठ्या मनानं मान्य,आम्ही आत्मचिंतन करु; विजयाचं गणित कुठं चुकलं, सतेज पाटील तीन मुद्दे सांगत म्हणाले…

३. तर तिसऱ्या चिठ्ठीमध्ये माजी चेअरमन सर्जेराव माने यांच्यावर टीका करत आपण ज्या कारखान्याबद्दल गरळ ओकत आहात त्या कारखान्याच्या आपण चेअरमन या सर्वोच्च पदावर होता. असा रंग बदलू सरडा चेअरमन झाला नाही आणि होणारही नाही असे म्हणत सभासद मतदाराने सर्जेराव माने यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी पार्टी बदलू सरडा चेअरमन आता होणार नाही. यासह अनेक गोष्टीवर सामान्य मतदारांनी दोन्ही गटांवर नाराजी व्यक्त केली आहे.

४. महाडिक साहेब कारखाना अगदी व्यवस्थित चालू आहे. परंतु कर्मचाऱ्यांची लग्न होत नाहीत, त्यांच्या ऑर्डरी तेवढ्या काढा, रिटार्यमेंटला आलीत तरी ती पर्मनंट नाहीत.

कुणाचा कंडका पडला? महादेवराव महाडिक यांचा विजयानंतर गुलाल उधळत सवाल,सतेज पाटलांना डिवचलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed