• Mon. Mar 9th, 2026

    मुलांना सोडून अन्न-पाण्यासाठी नागपुरात आले, नियतीने दाम्पत्याची अशी केली शिकार, सगळे हळहळले

    मुलांना सोडून अन्न-पाण्यासाठी नागपुरात आले, नियतीने दाम्पत्याची अशी केली शिकार, सगळे हळहळले

    नागपूर :नागपूर उपराजधानी आहे. आजूबाजूच्या गावातील जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नागरीक येथे व्यवसायासाठी किंवा रोजगारासाठी येतात. शिवनी, भंडारा, गोंदिया किंवा इतर कोणत्याही गावातील लोक काही ना काही कामासाठी नागपुरात येत असतात. पत्र्याची शेड किंवा झोपड्या उभारून अशा लोकांसाठी तात्पुरती व्यवस्था केली जाते. पण वादळ वाऱ्यात असे शेड उडून जाण्याची शक्यता असते. आणि त्यात नुकसान होण्याची शक्यता मोठी असते. अशाच आलेल्या वादळात पत्र्याची झोपडी कोसळून एका जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.छत्तीसगड येथील गौरीलाल पटेल (वय ३२) आणि त्यांची पत्नी रमला गौरीलाल पटेल (वय ३१) हे दोघेही मजुरीच्या कामासाठी नागपुरात आले होते. ते बालोदा बाजार येथील सोलदा गावचे रहिवासी होते. मनीषनगर येथील गुरुछाया सोसायटीतील सांजविला येथे ते मजूर म्हणून काम करायचे. कंत्राटदाराने पत्र्याच्या झोपडीत त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती.

    नागपुरात गुरुवारी आलेल्या वादळात झोपडीचे पत्रे उडाले आणि ते झोपडीवर पडले. या घटनेत झोपडीतील पती-पत्नी डोक्यावर हे पत्रे पडले. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचावर उपचार सुरू केला. मात्र उपचारादरम्यानच दोघांचाही मृत्यू झाला.
    मध्यरात्री तुरुंगासमोर आला, फटाके फोडले, गुन्हेगार भाऊचा वाढदिवस साजरा करून पळाला, पण…
    दोन मुले झाली पोरकी

    पटेल दाम्पत्याने आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी नोकरी करून घरी पैसे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही मुलांना गावातच ठेवले होते. एक तीन वर्षाचा आणि दुसरा पाच वर्षाचा मुलगा आहे. मात्र, निसर्गाचा कहर थांबला नाही. दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची दोन्ही मुले पोरकी झाली. आता पटेल यांच्या कुटुंबाची काळजी कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    नागपुरात वादळी पावसाचा कहर, घरावर झाड पडले, चारजण दबले, मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
    घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल मेश्राम घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या भागात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवर काम करणारे अनेक मजूर हे पत्र्याच्या झोपड्यांमध्ये राहतात. आणि गुरुवारी आलेल्या वादळी पावसाने अनेक झोपड्यांची छप्परे उडून गेली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed