• Sat. Sep 21st, 2024

आदल्या दिवशी कुटुंबियांनी रोखले, पण दुसऱ्या दिवशी तरुणाने तेच केले, शेवटी नको ती बातमी आलीच

आदल्या दिवशी कुटुंबियांनी रोखले, पण दुसऱ्या दिवशी तरुणाने तेच केले, शेवटी नको ती बातमी आलीच

जळगाव: तालुक्यातील तरसोद गावाजवळ सेंट्रींग कामगाराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ११ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. हरुण अब्दुल पिंजारी वय ४२ रा. बहाळ ता. चाळीसगाव असे मयत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.चाळीसगाव तालुक्यातील बहाळ या गावातील मूळ रहिवासी हरुण पिंजारी हे रोजगारानिमित्ताने त्याचे सासर असलेल्या जळगाव तालुक्यातील आसोदा या गावात इंदिरानगर येथे राहत होता. पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होता. ते सेंट्रींग काम करुन उदरनिर्वाह भागवत होते. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास साईटवर काम करणाऱ्या एका कामगाराची दुचाकी घेतली व मी जावून येतो असे सांगून हरुन पिंजारी बाहेर पडले. त्यानंतर उशीरापर्यंत घरी परतले नाही. याचदरम्यान तरसोद जवळ रेल्वे खंबा क्रमांक ४२५/३०-२३ याठिकाणी एका जणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली. लोकोपायलट यांनी घटनेची माहिती भादली रेल्वे स्टेशन मास्तर यांना कळविली, त्यांनी ही माहिती तालुका पोलिसात दिली, घटनेची माहिती मिळाल्यावर सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतलीय.

शेवटच्या चेंडूवर डाव फिरला, परफेक्ट प्लानिंग अन् मुंबईचा विजय; कॅमरूनने फोडलं विजयाचं गुपित
खिशात असलेल्या आधारकार्डवरुन मयत हे हरुण पिंजारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्या नातेवाईकांनी माहिती कळविण्यात येवून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे हे करीत आहेत.

पत्नीसोबत दुचाकीवरुन निघाले, वाटेत कारची भीषण धडक, अपघातात पतीचा जागीच मृत्यू
कामे घेतली, कामांचे पैसेही घेतले, मात्र कामे न केल्याने होते तणावात

हरुण पिंजारी यांनी अनेकांची कामे घेतली होती, तसेच पैसे सुध्दा घेतले होते, मात्र त्यानंतर ते संबंधितांची कामे करुन शकले नव्हते, कामाचे घेतलेले पैसे सुध्दा परत देवू शकत नव्हते यामुळे काही दिवसांपासून ते तणावात होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी सुध्दा ते आत्महत्या करण्यासाठी निघाले होते, मात्र कुटुंबिय तसेच गल्लीतील लोकांनी त्यांना रोखले होते. मात्र मंगळवारी सकाळी हरुण पिंजारी यांनी टोकाचं पाऊल उचललं. रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. मयत पिंजारी यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. कामामुळे हरुन पिंजारी यांनी गाव परिसरात चांगलीची ओळख होती. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोलीच्या दोन लोकल फेऱ्या रद्द, कारण…

नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed