रविवार दि.९ रोजी नेहमीप्रमाणे ते पुण्याला जात असताना त्यांना नसरापूर चेलाडी येथे एक प्रवाशी भेटला. त्यानंतर शिवापूरला एक आणि शिंदेवाडी येथे एक असे तीन प्रवाशी घेतले. त्यांच्या रिक्षातील तिन्ही प्रवाशी पुण्यातील कात्रज येथे उतरले. त्यानंतर रिक्षाला ऑनलाईन हडपसरचे भाडे लागले. मात्र हडपसरकडे जात असताना कुणाची तरी बॅग रिक्षात राहिली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ती बॅग त्या प्रवाशाला देता येईल या आशेने रिक्षाच्या डिकीत ठेवली.
भाडे करून झाल्यावर त्यांनी ती बॅग उघडुन पहिली तर त्यात एक डायरी, एक तोळ्याची चैन आणि तब्बल तीस हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. डायरी वाचून पाहिली असता त्यात एक फोन नंबर मिळाला. त्यानंबरवर रिक्षाचालक शिवतारे यांनी फोन लावला असता समोर बोलणारी व्यक्ती दत्तात्रय इंगुळकर (रा.कामथडी ता.भोर) ही व्यक्ती पुणे शहरात कामानिमित्त गेली होती. त्यांना फोनद्वारे बॅग सुरक्षित असल्याचे शिवतरे यांनी सांगितले.
शिवतारे यांनी फोनवर संपर्क करून त्यांना त्यांची बॅग, बॅगेतील ३० हजाराची रोक रक्कम सह एक तोळ्याची चैन त्यांना परत केली. यावेळी इंगुळकर यांच्या बरोबर असलेल्या त्यांच्या वडिलांनी रिक्षाचालक गणेश शिवतरे यांच्याकडून प्रामाणिकपणाचे उदाहरण दाखवून दिल्याने त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. गणेश शिवतारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
एक्स्प्रेस हाय वे ते रेल्वेचं जाळं, मुंबई-पुण्याला लाजवणाऱ्या प्रकल्पाने नांदेडची ताकद वाढवली