• Sat. Sep 21st, 2024

पारसच्या दुर्घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न, ७ लोकांचा मृत्यू; वाचा, असा आहे संपूर्ण घटनाक्रम

पारसच्या दुर्घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न, ७ लोकांचा मृत्यू; वाचा, असा आहे संपूर्ण घटनाक्रम

अक्षय गवळी, अकोला : अकोला जिल्ह्यात आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेलं पारस गावात बाबूजी महाराज संस्थान या संस्थांमध्ये आज सायंकाळी आरती सुरू होती. मंदिराच्या परिसरात असलेल्या टिनाच्या शेड खाली दर्शनासाठी तसेच पावसापासून आपला बचाव करण्यासाठी रस्त्यावरील वाहन धारक असे एकत्रित ४५ पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. अचानक यादरम्यान मंदिराला लागून असलेलं भल मोठं कडुलिंबाचे झाड अचानक उन्मळून टिनाच्या शेडवर कोसळले. शेड खाली असलेले सर्व लोक या खाली दबल्या गेले. या घटनेत आतापर्यंत ७ लोकांना आपला जीव गमावावा लागलाय. तर काही लोकांना सुखरूप बाहेर काढून बचवण्यात आले आहेत. यातील काही लोकांना हात-पायाला गंभीर दुखापत झाली असून जखमींचा आकडा २३ पेक्षा अधिक आहे. या सर्व जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. अशी माहिती बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे यांनी दिली आहे.या घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे त्यासह शोध बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं होतं.

अशी आहेत मृतकांची नावे

अतुल आसरे (वय ३२ वर्ष, बाभूळगाव जि. अकोला), विश्वनाथ तायडे (वय ३५ वर्ष, सोनखेड), पार्वताबाई महादेव सुशील (वय ६५ वर्ष आलेगाव बाजार), भास्कर आंबीलकर (वय ६० वर्ष अकोला), उमा महेंद्र खारोडे (वय ५० वर्ष, भुसावळ) अशी मृत व्यक्तींची नावं असून काहींचे अद्याप नावे कळू शकले नाहीत. तरीही यातील मृतकांची अद्याप पर्यंत ओळख पटली नसून दोन्ही पुरुष असून त्यांची वय ३५ आणि ४५ अशी आहे. बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जुंबळे यांनी ही माहिती दिली आहे.

अकोल्यात आरती सुरु असताना झाड कोसळलं; शेडखाली ५० लोक दबले, ७ जणांचा मृत्यू
अशी आहेत जखमींची नावे

कोमल जाधव, रूपाबाई तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, मुरलीधर अंबाकर, नारायण, भागीरथाबाई गुलाबराव लांडे, कौशल्याबाई इंगळे, सुप्रदाबाई वानखड़े, दिवाकर मधुकर इंगळे, सुनंदा रामदास पुंडे, शामराव आठवले, गणेश तायडे, लक्ष्मण बुटे, रामाभाऊ वासुदेव कसूरकार, रुखमा शालिग्राम तायडे, सुरेखा प्रकाश कांबळे, संकेत लक्ष्मण बुटे यासह अन्य लोक जखमी झाले आहेत.

कशी घडली होतं संपूर्ण घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात पारस हे गाव आहे. इथे बरड परिसरात बाबूजी महाराज संस्थान म्हणजेच मंदिर आहे. आज रविवार असल्याने सायंकाळी आरतीसाठी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी असते. संस्थान परिसरात आज रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास आरती सुरू झाली. या मंदिरा बाहेर टिनाचं मोठे शेड आहे. आज जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि पारस परिसरातील पाऊस सुरू झाला. रस्त्यावरील येजा करणारे लोकांनी पावसापासून वाचण्यासाठी टिन शेडचा आसारा घेतला. तसेच दर्शनासाठी आलेले लोक इथं जमलेले होते. या टिन शेड खाली ४० ते ५० लोक उपस्थित होते.

पतीने हळदी- कुंकू, टाचण्या, राख टाकून केला जादूटोणा; विवाहितेची पोलिसात तक्रार, पतीसह सासू, सासऱ्यांवर गुन्हा
दरम्यान अचानक पाऊस आणि वादळीवारामूळ मंदिराच्या संस्थांना लागून म्हणजेच मधोमध असलेले मोठं कडुलिंबाचं झाडं अचानक उन्मळून मंदिराच्या टिनाच्या शेडवर कोसळलं. यावेळी शेडवर पूर्णपणे झाड पडल्याने ते पूर्णता तुटले. अन् या खाली चाळीस ते पन्नास लोक पूर्णपणे दबले गेले. दरम्यान पाऊस आणि वारा यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळा येत होता, पण जेसीबी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तसेच बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने शेड खाली दबलेल्या असलेल्या लोकांना बाहेर काढून बचवण्यात आले. मात्र घटनेत ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे, तर अन्य लोक जखमी झाले असून या सर्वांवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींचा आकडा २३ असल्याचं समजते.

युद्धनौकेवर युद्धसराव सुरू असताना मोठा अपघात, अरबी समुद्रात नौसैनिकाचा मृत्यू
पारसच्या घटनेची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल

देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत अकोला जिल्ह्यातील घटने संदर्भात म्हणाले की, ‘आज सायंकाळी पारस इथे एका धार्मिक समारंभासाठी काही लोक एकत्र आले असता, टिनाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. ‘मी’ त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून जखमींवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी ते समन्वय ठेवून आहेत. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. काही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींवर बाळापूर येथे उपचार करण्यात येत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed