• Sun. Jun 14th, 2026

    स्टोव्हवर भाजी ठेवून त्या बाजूच्या घरी गेल्या, नंतर असे काही घडले की संसार उघड्यावर आला

    स्टोव्हवर भाजी ठेवून त्या बाजूच्या घरी गेल्या, नंतर असे काही घडले की संसार उघड्यावर आला

    नांदेड: नांदेड शहराजवळच्या नसरतपूर येथील एका घराला गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर आग लागून संपूर्ण घर जळून खाक झालं. यामुळे पीडित कुटुंबाकडे काहीएक उरले नसून हे कुटुंब उघड्यावर आले आहे. या गावात बुधवारी दुपारी ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही.नसरतपूर येथील रहिवासी जयभीम शिरसाठ हे मिस्त्रीच काम करतात. आज ते नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. त्यांची दोन मुलं, १४ वर्षीय सौरभ आणि ११ वर्षीय रोहीत हे दोघे शाळेत गेले होते. त्यांच्या पत्नी अनिता ह्या एकट्याच घरी होत्या. दुपारी त्या गॅसवर स्वयंपाक करत होत्या. मावशीचा फोन आल्याने गॅसवर भाजी ठेवून त्या बाजूला राहणाऱ्या मावशीच्या घरी गेल्या. काही क्षणात सिलेंडरचा स्फोट झाला आणि घराला आग लागली. या स्फोनंतर घरावरील पत्रे देखील उडाले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून बंबाने आग विझवली. मात्र तो पर्यंत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल. घटनेच्या वेळी घरात कोणी नसल्यानें सुदैवाने जिवीत हानी टळली.

    धक्कादायक! लग्नाची बोलणी करण्याच्या बहाण्याने घरी बोलावले, शितपेयातून गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार
    मिस्त्रीचे काम करणारे जयभीम शिरसाठ यांनी एक – एक रुपया जोडून सहा महिन्यांपूर्वी नसरतपूर येथे पत्र्याचं घर बांधल होतं. संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्यांचा पत्नीने देखील कर्ज काढून साड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. भीम जयंती असल्यानं त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. या कर्जाच्या पैश्याने दोन्ही मुलांचे शिक्षण सुरू होतं. शिवाय ब्युटी पार्लरचं साहित्य देखील त्यांनी खरेदी केलं होतं.

    मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं आणि या घटनेने काही क्षणातच होत्याच नव्हतं झालं. घरातील सगळंच साहित्य, मुलांची पुस्तके, काही पैसे आणि संसारोपयोगी वस्तू या आगीत खाक झाल्या. दरम्यान या घटेनेने शिरसाठ यांचा सांसर उघड्यावर आला आहे. या घटनेत पुस्तके देखील जळून खाक झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    फूड डिलिव्हरी कंपनी की गुंडांची गँग?; डोंबिवलीत पार्सलच्या पैशावरुन ग्राहक व डिलिव्हरी बॉयमध्ये तुफान राडा
    शिरसाठ कुटुंबीयांना मदतीची गरज

    हातावर पोट असणाऱ्या शिरसाठ कुटुंबीयांवर आगीच्या घटनेनंतर मोठं संकट ओढावलं आहे. पै-पै जमा केलेले पैसे आगीत जळून खाक झाले आहेत. शिवाय मुलांचे शिक्षण देखील अंधारात आलं आहे. त्यांचा सुखी संसार आता उघड्यावर आला आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबाला तातडीच्या मदतीची गरज आहे.
    RR vs-PBKS : हेटमायर, जुरेलचे प्रयत्न वाया, नॅथन एलिसच्या झंझावाती गोलंदाजीने पंजाबचा राजस्थानवर थरारक विजय

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed