२९ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पंडित काळे आणि त्यांचा मुलगा पारलेश काळे हे दोघे शारदानगर येथील घरी बसले होते. त्याचवेळी संशयित किशोर पवार, नितीन जाधव दोघे रा. आडूळ, तालुका पैठण आणि एक अनोळखी व्यक्ती हे एकच दुचाकीवरून आले. ‘माझी बायको नांदायला का पाठवत नाही,’ असे म्हणून तिघांनी पंडित काळे यांना शिवीगाळ केली. तर किशोर पवार याने काळे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात पंडित काळे यांचा मृत्यू झाला होता.
बार्शीतील निर्भया प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकरांचा फोन पीडित कुटुंबाला फोन करून धीर
या घटनेने अंबड शहरात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी घटना स्थळावर तत्काळ धाव घेत गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. दरम्यान, या घटनेला जवळपास पाच दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. आरोपींनी फोन बंद करून ठेवल्याने अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. आरोपींनी मोबाईल बंद करून ठेवल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेऊ अशी माहिती अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी दिली आहे.