मंत्रालयातील नोकरीची बनावट ऑर्डर दिली
यावेळी ओसवाल भावडांनी उर्वरित पैसे लवकर द्यायला सांगितले. त्यानुसार दिघोळे यांनी २७ मे २०१८ रोजी पुन्हा ७ लाख रूपये दिले. दरम्यान, नोकरीसाठी जॉईनिंग ऑर्डरची दिली नाही म्हणून ओसवाल बंधुंना फोन केला असता दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करत होते. याप्रकारे त्यांनी तब्बल दोन वर्षे टाळाटाळ केली. यानंतर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रभान ओसवाल हा दिघोळे यांच्या घरी आला. त्याने मंत्रालय मुंबईच्या नावाने झेरॉक्स असलेली बनावट ऑर्डर दाखविली, पर्यवेक्षक पदावर निवड झाल्याचे सांगत त्याने मुंबईला जावू व जॉईनिंग करु असे सांगितले. त्यानुसार दिघोळे दाम्पत्य मुंबईला गेले. मात्र याठिकाणी साहेब आजारी असल्याचे सांगत ओसवाल यांनी साहेबांशी भेट घडवून आणली नाहीय. त्यामुळे दिघोळे पुन्हा घरी आले.
नोकरी न लागल्याने पैशांची मागणी केली, चेक दिलेही, मात्र ते वटलेच नाहीत
त्यानंतर मुंबईला चंद्रभान ओसवाल आणि त्याचा मित्र हरताली प्रसाद रोहिदास यांनी मुलाला रेल्वे ज्युनीयर इंजिनिअर पदावर नोकरी लावून देतो, असे सांगत यासाठी आणखी ६ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यानुसार दिघोळे यांनी हरताली प्रसाद यांच्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने रक्कम ट्रान्सफर केली. अशा पध्दतीने ज्युनीयर इंजिनिअर पदाचीही खोटी ऑर्डर संबंधितांनी दिली.
अशा पध्दतीने दिघोळे यांनी वेळोवेळी ओसवाल भावंड व हरताली प्रसाद रोहिदास या दोघांना एकूण २२ लाख रुपये दिले. प्रत्यक्षात नोकरी लागली नाही. दिघोळे यांनी संबंधितांनी आम्हाला आमचे पैसे परत करा अन्यथा नोकरीची ऑर्डर द्या असे सांगितले. चंद्रभान ओसवाल याने वेगवेगळ्या रकमांचे चेक दिले. मात्र हे चेक वटले नाहीत. चेकचा अनादर झाला.
शेवटी ओसवाल भावंडे व हरताली या तिघांनी आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर प्रविणचंद दिघोळे यांनी रविवार, २६ मार्च रोजी जळगाव शहरातील रामानंदनगर पेालीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन चंद्रभान जवरीलाल ओसवाल, अनिल जवरीलाल ओसवाल आणि हरताली प्रसाद रोहिदास (पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.