• Sat. Sep 21st, 2024
कानिफनाथ मढीच्या यात्रेला गेलेले तरुण परतलेच नाहीत, गोदावरीत स्नानासाठी उतरले आणि घात झाला

अहमदनगर : कावडीने पाणी नेण्यासाठी वैजापूर तालुक्यातून कायगाव टोका येथे आलेले चार तरुण गोदावरी नदीत बुडाले आहेत. यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून इतरांसाठी शोधकार्य सुरूच आहे. त्यांचाही मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे.

वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील बाबासाहेब अशोक गोरे (वय ३५), नागेश दिलीप गोरे (वय २०), आकाश भागिनाथ गोरे (वय २०) व शंकर पारसनाथ घोडके (वय २२) हे तरुण शनिवारी दुपारी नेवासा तालुक्यातील प्रवरासंगमजवळ कायगाव येथे कावडीने पाणी आणण्यासाठी आले होते. पाय घसरून पाण्यात पडल्याने आणि एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघेही बुडाल्याचे सांगण्यात येते. शंकर पारसनाथ घोडके याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. इतरांचा शोध सुरूच आहे.

स्मार्टवॉचच्या वापराने तरुणाला थेट पोहोचवले रुग्णालयात, असे कसे घडले हे जाणून घ्या
दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच थोड्याच वेळात प्रशासनही दाखल झाले. ग्रामस्थ आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.

सोलापुरात टोळक्याचा धुडगूस, लव जिहादच्या संशयावरून तरुणास बेदम मारहाण, तरुणीने दिला हा जबाब
वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील हे चार तरुण पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र कानिफनाथांच्या मढीच्या यात्रेसाठी निघाले होते. रस्त्यात ते गोदावरी नदीत अंघोळीसाठी आणि कावडी भरण्यासाठी उतरले. त्यावेळी त्यातील दोन जण बुडू लागले. हे पाहून त्यांना वाचवण्यासाठी गेलेले अन्य दोघेही बुडाले आहेत. नदी काठावरील इतरांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ मदतीला धावले.
चंद्रकांतदादांची ती ऑफर, राजू शेट्टी यांनी दिला तातडीने नकार, दादांच्या प्रयत्नांना घातला खो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed