मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जालन्यात उपोषण सुरू आहे. शेतकरी गजानन उगले हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. दुष्काळ आढावा बैठकीत नेते-अधिकारी काजू-बदाम खातानाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.यावरून उपोषणकर्ते गजानन उगले यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.कोरडा दुष्काळ जाहीर केला नाही तर उद्यापासून पाणीसुद्धा पिणार नाही, असे ते म्हणाले.राज्यातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांची ७० टक्के पगार कपात करावी, असेही ते म्हणाले.