उपोषणाच्या १८ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.ही शेवटची लढाई असे म्हणत जरांगेंनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मी एकट्यानेच मुंबईत जाणार असा निर्धार त्यांनी केला.मात्र आम्ही जरांगेंना एकटं सोडणार नाही अशी भूमिका समाज बांधवांनी घेतली आहे.आम्हीही गनिमी कावा करून मुंबईत जाणार, अशी ठाम भूमिका जरांगे समर्थकांची आहे.