• Mon. Aug 31st, 2026

Eknath Shinde Parbhani Visit: मराठा समाजाच्या प्रश्नांवर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे आम्ही नेहमीच स्वागत केले आहे. इतरांचे हक्क न काढता मराठा समाजातील शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न सनदशीर मार्गाने सोडवून न्याय दिला जाईल, असे ते म्हणाले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, परभणी: परभणीमध्ये दौरा करू नये, असे आव्हान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. मात्र शिंदे यांचा परभणी दौरा सुरळीत पार पडला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधला.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आपण स्वतः यापूर्वी दोन वेळा चर्चा करून मुख्यमंत्री असताना स्वतंत्र १४ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन मंत्र्यांना पाठवून चर्चा सुरू ठेवली असून सरकार तोडगा काढण्यास कटिबद्ध आहे.’ ‘महायुती सरकारने २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना व गोरगरिबांना शिक्षणात सवलती व मोठे आर्थिक साह्य दिले आहे,’ असे ते म्हणाले.

Maharashtra TimesEknath Shinde : भाषणावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, एकनाथ शिंदे यांचं जरांगेंचा उल्लेख करत भावनिक भाष्ययुवकांची घोषणाबाजी

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सुरू होताच काही युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, ‘हे युवक आपलेच आहेत, त्यांना मंचावर चर्चेसाठी बोलवा,’ असे सांगत शिंदे यांनी वातावरण शांत केले. खासदार संजय जाधव यांनीही शांततेचे आवाहन केले. दरम्यान, कार्यक्रम स्थळाबाहेर ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Maharashtra TimesBandu Jadhav : ‘माणूस खास, असली शिवसेना मे आया बंडू बॉस’, एकनाथ शिंदे यांची परभणीत डायलॉगबाजीजाधव यांचा माफीनामा
परभणी दोन महिन्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घ्यावयाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. एकदा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. अशा परिस्थितीत पुन्हा ऐन वेळी कार्यक्रम रद्द करा असे सांगितल्यानंतर मी येणाऱ्या लोकांना काय उत्तर देणार, असे सांगून खासदार संजय जाधव यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभेत माफी मागितली. ‘कार्यक्रम रद्द करणे शक्यच नव्हते, त्यामुळे भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो,’ असे खासदार जाधव यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी आयोजित मेळावा रद्द करावा, अशी सूचना सकाळी ११ वाजता मनोज जरांगे यांनी आयोजक खासदार जाधव यांना केली होती.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा