• Mon. Aug 31st, 2026

Sanjay Raut On Nashik Kumbh Mela: नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांत २५ हजार कोटींची उधळपट्टी होणार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, कुंभमेळ्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या बजेटपैकी तब्बल २५ हजार कोटी रुपये कुंभमेळा मंत्री आणि अधिकारी मिळून उधळणार असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

नाशिककरांनी मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यावर आणि त्यांच्या भाषणावर बहिष्कार टाकल्याचे दिसून येते, असा दावाही राऊत यांनी केला. लोकांनी मुख्यमंत्र्यांकडे गांभीर्याने पाहणे सोडले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २८) झालेल्या ‘सिंहस्थ महाकुंभ भक्तिसंगम’ कार्यक्रमातील गर्दीवरून राऊत यांनी टीका केली.

Maharashtra TimesNashik Crime: सहा कैद्यांचा कारागृह शिपायावर हल्ला; अधीक्षकांच्या संचार फेरीवेळी धुडगूस, काय घडलं?‘राऊतांना अर्धवट माहिती’

नाशिकमधील कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी प्रत्युत्तर दिले. राऊत स्वतः कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचविण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या. मुळात ‘भक्ती संगम’ कार्यक्रम सिंहस्थ प्राधिकरणाचा होता. या कार्यक्रमासाठी साधू-महंतांसह विशिष्ट निमंत्रितांनाच आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी पास देण्यात आले होते. तसेच जास्तीच्या खुर्च्या रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ठेवल्या होत्या. त्यामुळे राऊत यांचे विधान अर्धवट माहितीच्या आधारे आहे, असा आरोप महापौर आहेर-आडके यांनी केला. कुंभमेळ्यासंदर्भात अशा प्रकारचे ट्वीट करणे अयोग्य आहे. कुंभमेळ्याच्या कार्यक्रमांना बदनाम करण्याचे षडयंत्र ठाकरे गटाने थांबवावे, असे आवाहनही महापौरांनी केले.

Maharashtra TimesSamruddhi Mahamarg Robbery: महामार्गावर चोरट्यांची ‘समृद्धी’; टायर पंक्चरचा सापळा रचून 18 लाख लुटले, वकिलाच्या कुटुंबाला मारहाणसंजय राऊत म्हणाले…
– कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावर केवळ विरोधकच नव्हे, तर साधू-संतही उघडपणे बोलू लागले आहेत
– नाशिकमधील विकासकामांमध्ये कोणतेही नियोजन नाही
– सरकारला नाशिकमधील खड्डे दिसत नाहीत का? या खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू दिसत नाहीत का ?
– केवळ निविदा काढणे व कंत्राटदारांना कामे देणे एवढेच सरकारचे काम, त्यामुळे नाशिककरांचे हाल होत आहेत.
– दहा वर्षांपूर्वी नाशिक दत्तक घेतल्याचे फडणवीस विसरले आहेत. शहराची दुर्दशा झाली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा