• Sat. Aug 29th, 2026

डॉ. चितळेंसह ग्रुप नेपाळ महापुरावेळी रसुवागढीच्या इमिग्रेशन केंद्रावर, रिचा ट्रेक्सची माहिती, गंभीर फटका बसल्याची भीती

Dr Milind Chitley Missing : डॉ. चितळेंचा ग्रुप अचानक निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या वेळी रसुवागढीच्या इमिग्रेशन केंद्रावरच होता, असे चितळे यांच्या हिल्स अँड ट्रेल्स तसेच हे पर्यटक ज्यांच्या सहकार्याने प्रवास करत होते त्या काठमांडूच्या रिचा ट्रेक्सने स्पष्ट केले आहे. घटनास्थळावरील पाहणी, हेलिकॉप्टरद्वारे केलेली हवाई पाहणी आणि तेथील व्हिडिओ फुटेज यावरून रसुवागढी येथे त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांवर झालेल्या परिणामाची व्याप्ती अत्यंत चिंताजनक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : तिबेटमधील कैलास मानसरोवर यात्रेसाठी मुंबईतील डॉ. मिलिंद चितळे यांच्यासोबत गेलेल्या पर्यटकांसह ६० जणांचा ठावठिकाणा गेल्या ४८ तासांपासून सापडत नसल्याचे नातेवाईक सांगत आहेत. हा गट अचानक निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या वेळी रसुवागढीच्या इमिग्रेशन केंद्रावरच होता, असे चितळे यांच्या हिल्स अँड ट्रेल्स तसेच हे पर्यटक ज्यांच्या सहकार्याने प्रवास करत होते त्या काठमांडूच्या रिचा ट्रेक्सने स्पष्ट केले आहे. घटनास्थळावरील पाहणी, हेलिकॉप्टरद्वारे केलेली हवाई पाहणी आणि तेथील व्हिडिओ फुटेज यावरून रसुवागढी तिथे त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांवर झालेल्या परिणामाची व्याप्ती अत्यंत चिंताजनक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

महापुरावेळी चितळे रसुवागढीत

शुक्रवारी सकाळी, ‘नेपाळ माउंटेनियरिंग असोसिएशन’चे बचाव पथक नेपाळ-तिबेट (चीन) सीमेवरील त्या आपत्तीग्रस्त ठिकाणी पोहोचले. हा पूर आला तेव्हा रसुवागढी इमिग्रेशन केंद्रावर एकूण ६४४ व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये ५१७ परदेशी नागरिक, ज्यात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे, आणि १२७ नेपाळी नागरिकांचा समावेश होता. डॉ. मिलिंद चितळे यांचा गट याच इमिग्रेशन केंद्रावर उपस्थित होता. बचाव पथकाच्या पाहणीतील माहितीनुसार कस्टम्स आणि इमिग्रेशन केंद्रावर असलेल्या यात्रेकरुंना पुराचा गंभीर फटका बसला आहे असे निवेदनात म्हटले आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesSanjana Agarwal : खूप गिल्टी वाटतंय, रक्षाबंधनाला केतनच्या आठवणीत संजनाला अश्रू अनावर, सियाला मिळणाऱ्या VIP ट्रीटमेंटचं कारण सांगितलं

कुणालाही सुरक्षित बाहेर काढलेलं नाही

या इमिग्रेशन केंद्रावरून कोणत्याही नेपाळी कर्मचाऱ्याचा शोध लागलेला नाही किंवा त्यांना सुरक्षित बाहेर काढता आलेले नाही. चीनचे बचाव पथक, नेपाळ लष्कर, नेपाळ पोलीस आणि नेपाळ माउंटेनियरिंग असोसिएशन आपत्तीग्रस्त ठिकाणी शोध आणि बचाव कार्य करत आहेत. त्याच वेळी, आपत्तीग्रस्त ठिकाणापर्यंत पोहोचणे कठीण झाले असून त्या भागात केवळ बचाव पथकांनाच जाण्याची परवानगी आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या नेपाळ-तिबेट/चीन सीमेवरील आपत्तीग्रस्त ठिकाणाहून कोणालाही वाचवण्यात किंवा सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेले नाही, असे शुक्रवारी संध्याकाळी हिल्स अँड ट्रेल्सचे प्रा. चारुहास जोशी आणि रिचा ट्रेक्सचे सांगे गुरांग यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Maharashtra TimesShiv Sena vs BJP : शिवसेनेकडील खात्यांमध्ये CMO ची ढवळाढवळ, मंत्र्यांची शिंदेंकडे जाहीर नाराजी, रिक्षाचालकांच्या मराठीला मुदतवाढ मिळताच कडेलोट
मुंबईतील अंधेरीचे रहिवासी असलेले डॉ. मिलिंद चितळे हे व्यावसायिक डॉक्टर आहेत. तसेच ते अव्वल गिर्यारोहकही आहेत. त्यांना हिमालयातील मोहिमांचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी कांचनजुंगा सर केले असून त्यांना गिर्यारोहणातील कामगिरीसाठी गिरिमित्र पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते. काश्मीरपासून नेपाळपर्यंत अनेक सहलींचे आयोजन करण्यातही त्यांचा हातखंडा आहे.