Nagpur News: नेपाळमध्ये भीषण महापूराची घटना घडली. यावेळी नेपाळमध्ये पर्यटनासाठी नागपूरातील १०६ नागरिक गेले होते. ते सुखरूप असून त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
महापुरामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली
तिबेटलगतच्या मध्य नेपाळमधील दोन जिल्ह्यांत बुधवारी पहाटे आलेल्या महापुरामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली. नदीकाठच्या वस्त्यांचे मोठे नुकसान झाले. याच काळात नागपुरातील १०६ पर्यटक श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये होते. हे सर्वजण २२ ऑगस्ट रोजी काठमांडू येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांनी धार्मिक स्थळांनाही भेटी दिल्या.
Chlorine Gas Leak: गोधनी क्लोरीन घटनेची शंकरपुरात पुनरावृत्ती ; तीन दिवसांत दुसरी दुर्घटना, संकट टळले ,सुरक्षेवर मात्र प्रश्नचिन्ह
पर्यटकांनी व्यक्त केले समाधान
मात्र, महापुराची माहिती मिळताच त्यांनी परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या हे सर्व नागरिक काठमांडू येथील माहेश्वरी समाज भवनात सुरक्षित आहेत. नेपाळ प्रशासनाकडून आवश्यक मदत मिळत असून सहकार्य केले जात असल्याचे पर्यटकांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या मध्यस्थीने परतीची व्यवस्था झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले. जनकपूर सीमेवरून पुढे दानापूरपर्यंत बसने आणि त्यानंतर रेल्वेने त्यांना नागपुरात आणण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Amravati Hospital Fire: डफरीनमध्ये दोन नवे एनआयसीयू कक्ष स्थापन होणार ; युद्धपातळीवर काम सुरू, उच्चस्तरीय बैठकीत झाले नियोजन
भावना व्यक्त
‘मी आठ वर्षे नेपाळ येथे एका कंपनीत काम केले. तिथे मित्रही बनले. काही कार्यालयीन कामानिमित्त १३ ऑगस्ट रोजी मी नेपाळ येथील बुटवॉल येथे गेलो. तेव्हा नेपाळमद्ये आल्हाददायी वातावरण होते. सर्वत्र शांतता होती. जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांतून आलेले पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होते. निसर्गाने नेपाळला भरभरून दिले. मीही हा निसर्ग अनुभवला. त्यानंतर परतीचा प्रवास धरला आणि २५ ऑगस्टला घरी परतलो. दुसऱ्याच दिवशी नेपाळमध्ये महापूर आल्याची बातमी वाचली. धक्काच बसला. यात अनेकांना प्राण गमवावे लागले. लवकर नेपाळची परिस्थीती चांगली व्हावी, अशी प्रार्थना देवाकडे केली आहे’, अशी भावना विदर्भातील अक्षय कान्हेरकर यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.
