Mumbai News: प्रजा फाउंडेशनने मुंबई शहरातील आमदारांचे प्रगतीपुस्तक जारी केले असून विविध निकषांचे आधारे आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे.
मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: स्वयंसेवी संस्था प्रजा फाउंडेशनच्या ‘मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड २०२६’मधून काँग्रेसच्या आमदारांनी हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ चमकदार कामगिरी केल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड यांनी या अहवालात अव्वल स्थान पटकावले आहे.
मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे. या काळात १५व्या विधानसभेत एकूण २,२१३ प्रश्न विचारण्यात आले. १२व्या विधानसभेतील याच कालावधीतील ७,९५५ प्रश्नांच्या तुलनेत ही संख्या ७२ टक्क्यांनी कमी आहे.
विधानसभेचे कामकाज पहिल्या वर्षात केवळ ४० दिवस झाले. ३३ आमदारांपैकी केवळ तीन आमदारांना ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. आमदारांचे सरासरी गुणही १२व्या विधानसभेतील ६१ वरून १५व्या विधानसभेत ५५ वर आले आहेत. प्रश्नांच्या गुणवत्तेची सरासरीही ५० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांवर घसरली आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये पहिल्या तीनही क्रमांकांवर काँग्रेसच्या आमदारांनी बाजी मारली. अमीन पटेल यांनी ८२.८९ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला, तर अस्लम शेख ८०.५८ गुणांसह दुसऱ्या आणि ज्योती गायकवाड ८०.३० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या यादीत चौथ्या क्रमांकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू आणि पाचव्या क्रमांकावर ठाकरेंच्या शिवसेनेचेच भायखळ्याचे आमदार मनोज जामसुतकर हे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरळीतील आमदार आदित्य ठाकरे हे या यादीत १८ व्या स्थानी आहेत.
आमदारांची सभागृहातील उपस्थिती, विचारलेल्या प्रश्नांची संख्या, प्रश्नांचे विषय, गुन्हेगारी रेकॉर्ड अशा आधारावर ही कामगिरी ठरवण्यात आली आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये सगळ्यात खालच्या स्थानी म्हणजे ३३ व्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे असून शिवसेनेचेच आमदार अशोक पाटील हे ३२ व्या क्रमांकावर आहेत. तर घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम हे ३१ व्या क्रमांकावर आहेत.
मुंबईतल्या एकूण आमदारांचे सरासरी वय कालानुरूप वाढत असल्याचे दिसते: १२व्या विधानसभेत आमदारांचे सरासरी वय ५२ वर्षे होते, १३व्या विधानसभेत ते काहीसे कमी होऊन ५१ वर्षे झाले. १४व्या विधानसभेत ते पुन्हा वाढून ५३ वर्षे आणि आता १५व्या विधानसभेत ते ५७ वर्षे झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा