#rajendradate #marathareservationgr #manojjarange #marathareservation #devendrafadnavisमराठा आणि ओबीसी समाजात विनाकारण निर्माण झालेला तेढ कायमस्वरूपी संपुष्टात यावा आणि मराठा समाजाला न्याय मिळावा, या मुख्य मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक राजेंद्र दाते पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा काळ वाढल्याने दाते पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन ते तीन दिवसांत राज्य शासनाने आमच्या मागण्यांनुसार अध्यादेश (GR) काढला नाही, तर सुरू असलेली औषधे आणि गोळ्या पूर्णपणे बंद करू, असा थेट इशारा दाते पाटलांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.