जयेश साबळे, नाशिक : सध्या नाशिक शहरात खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला असतानाच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने आता आणखी एक बळी घेतला आहे. अंबडगाव औद्योगिक परिसरातील एक्सलो पॉईंटजवळ अंबड गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास खड्डा चुकवण्याच्या नादात एका ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात निलेश कोतकर या ४० वर्षीय दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंदनगर, कामटवाडा परिसरात राहणारे आणि एका खाजगी कंपनीतील कर्मचारी असलेले ४० वर्षीय दुचाकीचालक निलेश कोतकर यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली होती. या अपघातात कोतकर हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांच्या छाती, हात आणि चेहऱ्याला गंभीर जखम झाली होती. घटनेची माहिती मिळताच कंपनीतील सहकारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने कोतकर यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
कोतकर कुटुंबातील कर्ताधरता पुरुष हा शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांचा बळी ठरला आहे. निलेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होताच त्यांच्या मित्राने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात ट्रकचालकाविरोधात बुधवारी रात्री एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रकचालक अद्याप फरार आहे.
दरम्यान, अपघातातील संशयित ट्रकचालकाविरोधात गुन्हा तर दाखल झाला, परंतु खड्ड्यांना तसेच रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? त्यांच्यावर काही कारवाई होणार की नाही? असा संतप्त सवाल आता नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.
आधीच खड्डे, त्यात रम्बलर्सचा त्रास!
सिंहस्थाची कामे अन् पावसामुळे शहरभरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककर आधीच त्रस्त झालेले आहेत. त्यातच महापालिकेने रस्तोरस्ती रम्बलर्स (रम्बल स्ट्रिप्स) टाकून नाशिककरांच्या मार्गात अडथळ्यांची शर्यत अधिक वाढवली आहे. रस्त्यांची वाट लावलेल्या एका ठेकेदाराला तब्बल दहा कोटींचे कंत्राट देऊन खोदल्या जाणाऱ्या रस्त्यांवरच रम्बलर्सची ‘पेरणी’ केली जात असल्याने ‘खड्डे झाले थोडे, त्यात रम्बलरचे घोडे’ अशी नाशिककरांची अवस्था झाली आहे.
शहरातील रस्त्यांवर दीड हजारपेक्षा अधिक गतिरोधक असताना नियमांची ऐशीतैशी करून आतापर्यंत २४० ठिकाणी रम्बलर्स बसविण्यात आले असून, १५० ठिकाणी ते प्रस्तावित आहेत. त्यामुळे ठेकेदारासाठी केलेली उधळपट्टी सध्या शहरात चर्चेचा विषय बनली आहे. नाशिक शहरात सध्या सिंहस्थानिमित्त दीड हजार कोटी रुपये खर्चुन २८ प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा