Samruddhi Highway: सोमवारी पहाटे वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर इथेनॉलने भरलेला एक ट्रक उलटला यामुळे काही क्षणातचं एक भीषण अपघात झाला. दुसऱ्या भरधाव आयशर ट्रकने एका चारचाकीला धडक दिली. या अपघातात गाड्यांचा चेंदामेंदा झाला.
नेमकं काय घडलं?
सोमवारी मध्यरात्री एक इथनॉलने भरलेला ट्रक मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर पलटला त्यामुळे संपूर्ण महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश दिले होते. काही क्षणातचं मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने एका चारचाकीला धडक दिली. या धडकेत गाडीती चौघांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी तीन प्रवासी एकाच कुटुंबातील होते व चौघंही वर्धा जिल्ह्यातील रहिवासी होते. यासह ट्रकमधील दोघांचाही जागीच अंत झाला.
Mumbai BEST Bus Accident: भरधाव ‘बेस्ट’ थेट दुभाजकावर धडकली, ६५ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच अंत; सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात
समृद्धी महामार्गावर पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वीरूळ इंटरचेंजवळ या आयशर ट्रकने चारचाकीला पहाटे ३च्या सुमारास धडक दिली. या वेळी चाराचकीमध्ये राजेश टिपले त्यांची मुलगी जान्हवी टिपले, पत्नी सुषमा टिपले आणि चालक अंकुश राऊत हे बसले होते. राजेश टिपले यांना दोन जुळ्या मुली आहेत. त्यापैकी एकीला पुण्यात उच्च शिक्षणासाठी एमबीएला प्रवेश मिळाला होता. तिला पुण्यात सोडून कुंटुंबातील इतर चौघं जण वर्ध्याहून पुण्याला निघाले होते. त्याचवेळी काळाचा घात झाला आणि हा भीषण अपघात झाला. कुटुंबातील तिघं जण मुलीला मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला म्हणून आनंदात पुण्याला निघाले होते. क्षणात त्यांचं स्वप्न भंग झालं. शिवाय राजेश यांच्या दुसऱ्या मुलीने आपले आई-वडील आणि तिच्या सख्ख्या जुळ्या बहिणीला गमावल्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण टिपले कुटुंबात शोकाकुलता पसरली आहे.
ट्रकमधील दोघांचाही मृत्यू
दरम्यान, मिरच्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये ट्रकचालक व अजून एक सहप्रवासी होता. धडकेमुळे ट्रकला आग लागली. या दोघांचाही या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक चालकाचं नाव संजय कुमार असून तो उत्तर प्रदेशात धनाजीपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. दुसरा प्रवासी क्लीनर असून त्याचं नाव समरजित पाल असं होतं व तो उत्तर प्रदेश राज्यात गडहरियनपूर जिल्ह्यातील रहिवासी होता. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
Accident News : आयशरला धडकून कारचा चेंदामेंदा, शासकीय सेवेतील दोघा चुलत भावांचा करुण अंत, पत्रा कापून बाहेर काढण्याची वेळ
मुलीच्या आयुष्यातील इतका मोठा टप्पा गाठून तिला शुभेच्छा देऊन पुन्हा घरी निघाले असताना काळाने झडप घेतली. मुलगीही आपलं शिक्षण आणि पुण्यात आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी उत्साही होती. परंतु, तिच्या उत्साहाचं अवघ्या काही तासांमध्ये दुःखात रुपांतर झालं.
महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे एक-दोन नव्हे तर चारही कुंटुंब उध्वस्त झाली आहेत. असे अपघात रोखण्यासाठी कशी सावधगिरी बाळगली पाहिजे, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा
