कोकणातील विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. महाविकास आघाडीकडून बाळ माने यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला. ज्याचं श्रेय शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांना दिलं जात असतानाच सामंतांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बाळ माने यांच्या माघारीची माहिती नसल्याचं सामंत यांनी म्हटलं.