• Tue. Jul 14th, 2026
    महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर


    Marathi Live News: टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या पवन यादव आणि हरीओम पानू या दोघांना भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसानंतर वसई, विरार आणि पुणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीने महानगरांच्या आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हवामान बदलामुळे अल्पावधीत अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, मुंबईसारख्या महानगरातही भविष्यात अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागल्यास त्यासाठीची तयारी कितपत आहे, याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed