म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईसह धरण क्षेत्रात पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतल्याने शहराच्या पाणीसाठ्याबाबत चिंता वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये रविवारीपर्यंत एकूण ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, हा साठा सुमारे १५० दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास पाणीसाठ्यावर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी मुंबई महापालिका क्षेत्रातील विहार तलाव ७ जुलै रोजी रात्री ९ वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. गेल्या वर्षी हा तलाव १८ ऑगस्ट रोजी भरला होता. विहारची पाणीसाठवण क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर आहे. त्याच दिवशी तुळशी धरणही १०० टक्के भरून वाहू लागले. सातही धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असून, सध्या त्यामध्ये सात लाख २१ हजार ३५४ दशलक्ष लिटर म्हणजेच ५० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ७४ टक्के होता. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबई आणि धरणक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. शनिवारी सातही धरण क्षेत्रांत शून्य मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर रविवारीही समाधानकारक पाऊस झाला नाही.
महापालिकेच्या गणनेनुसार, धरणांतील प्रत्येक एक टक्का पाणीसाठा साधारण तीन दिवस पुरतो. त्या दृष्टीने सध्याचा ५० टक्के साठा सुमारे १५० दिवसांसाठी पुरेसा आहे. मात्र, पावसात आणखी खंड पडल्यास साठ्यात घट होण्याची शक्यता असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे.
पुण्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस घटला
शहरात गेल्या आठवड्यात जोरदार बरसलेल्या पावसाने चार दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही पावसाचा जोर ओसरला असून, अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. शहरात रविवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. तापमानातही थोडी वाढ होऊन दिवसभरात कमाल ३०.५ आणि किमान २३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील चार दिवस शहरात दुपारनंतर आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले असून, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात १२ जुलैपर्यंत गतवर्षीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील पवना, मुळशी; तसेच काही पूर्व भागांत गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जूनअखेरीस केवळ १२ टक्क्यांवर आलेला खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. सध्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये एकूण १६.८० अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ५७.६३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे दीड टीएमसी पाण्याचा विसर्ग करावा लागला.
आतापर्यंत झालेल्या पावसाची तुलना करता खडकवासला धरणात ४१९ मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षी ३९० मिमी पावसाची नोंद होती. मात्र, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. दुसरीकडे, पवना धरण परिसरात यंदा १,४८५ मिमी, तर मुळशी परिसरात २,७०३ मिमी पाऊस झाला असून, दोन्ही ठिकाणी गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा