सोमवारी मातोश्रीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत देखील उपस्थित होते. मात्र यांच्यासोबतच माजी खासदार विनायक राऊत हे सुद्धा नेहमीच ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळतात. विशेष म्हणजे विनायक राऊत हे मुंबईतच होते तरी ते या पत्रकार परिषद दिसले नाहीत. खरंतर विनायक राऊतांच्या सूनबाई गिरीजा यांनी केलेल्या आरोपांमुळे राऊत कुटुंबीय अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. पण यावेळी ठाकरे उठून निघून गेले आणि पुन्हा पत्रकारांसमोर येऊन बसले. नेमकं काय घडलं