मुंबईतील कांदिवली येथे झालेल्या रामरक्षा आंदोलनात आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. तर उपस्थित शिवसैनिक आणि स्थानिकांनी सुद्धा भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अयोध्येतील राम मंदिराच्या दान चोरी प्रकरणावरून ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून रामरक्षा आंदोलनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. चोरी खपवून घ्यायची नाही आणि अब हिंदू माफ नहीं करेगा असं भाजपवाल्यांना ठणकावून सांगायचं, असं आवाहन ठाकरेंनी केलं.