पोलीस भरतीचे आमिष दाखवून पीडितेला जबरदस्ती करुन तिच्यावर अत्याचार करण्याच्या आरोप प्रकरणात दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : पोलीस भरती आणि बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य राखीव पोलिस दलातील पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि मुंबई बँड पोलीस दलातील कॉन्स्टेबल मारुती करे यांच्याविरुद्ध बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ कुंभार हा दौंड येथील राज्य राखीव पोलrस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तर मारुती करे हा मुंबई बँड पोलीस दलात कॉन्स्टेबल आहे. दोन्ही आरोपींनी पोलीस भरती प्रक्रियेत मदत करण्याचे आश्वासन देत पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडितेचा तक्रारीची दखल न घेतली गेल्याचा आरोप
पीडित महिलेने सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यानंतर बारामती ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यान्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पीडितेचा आंदोलनाचा इशारा
दरम्यान, गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवूनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आरोपींना तातडीने अटक न केल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही तिने दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती ग्रामीण पोलीस करत आहेत.
पीडितेने सांगितली आपबिती
“मी 2022 पासून पोलीस भरतीची तयारी करत होते. 2024-25 मध्ये मला माहिती मिळाली की, बँड्समन पदाबाबतही भरती निघते. त्या पदासाठी मी अर्ज केला होता. मला त्याबाबत काही माहिती नव्हती. त्यावेळी मला एका मैत्रिणीकडून बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे सर यांचा फोन नंबर मिळाला. मी त्यांना फोन केला. मी त्यांचा क्लास जॉईन केला. मी रेग्यूलर क्लासला जाऊ लागले”, असं पीडिता म्हणाली.
“एकेदिवसी क्लास चालू असताना क्लासमध्ये पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार सर आले. तिथे आमची ओळख झाली. आठ दिवसांनी करे सर म्हणाले की, तुम्हाला भेटायला कुंभार सर आले आहेत. त्यांना भेटुयात. मी त्या गोष्टीला विरोध केला. पण तरीही त्यांनी मला वारंवार भरतीचा प्रेशर करुन नेलं”, असं पीडितेने सांगितलं.
जबरदस्ती फ्लॅटमध्ये नेल्याचा आरोप
“मी त्यांना बोलले की, इथे फ्लॅटखालीच बोला. पण ते बोलले इथे नको. इथे लोकं बघत आहेत, वरती चला. त्यामुळे आम्ही तिघेजण फ्लॅटमध्ये गेलो. त्यावेळी करे सर थंडा आणण्याचं कारण देऊन निघून गेले. कुंभार सरांनी दार लावलं. मी त्यांना रोखलं. त्यांनी घाबरु नको असं म्हणत पाणी दिलं. ते पाणी दिल्यानंतर मला चक्कर येऊ लागले. मी म्हटलं की, मला घरी जायचं आहे. पण त्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. पाऊण तासांनी करे सर आले. त्या दोघांनी मला धमकी दिली की, तू कुणाला सांगितलं तर तुला भरती होऊ देणार नाही”, असा आरोप पीडितेने केला आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
“मी पोलीस प्रशासनाकडे 8 एप्रिल 2026 पासून जात आहे. पण तिथे माझी कुणीच दखल घेतली नाही. सर्व गोष्टींची टाळाटाळ चालू होती. 14 एप्रिलला माझा फक्त तक्रार अर्ज घेतला. शेवटी मी कोर्टात धाव घेतली. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार, 5 जुलैला दोघांवर गुन्हा दाखल झाला. पण अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही”, अशी खंत पीडीतेने व्यक्त केली.
‘पुरावे नष्ट होण्याची भीती’
“ते स्वत: पोलीस असल्यामुळे प्रशासन त्यांना पाठिशी घालत आहे. त्यांना अटक न झाल्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यांना तात्काळ अटक केली नाही तर पुणे येथे एसपी कार्यालयासमोर मी धरणे आंदोलन करणार आहे”, असा इशारा पीडितेने दिला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा