Marathwada Earthquake : मध्यरात्री ०१:३७ ते ०३:२३ या दोन तासांमध्ये भूकंपाचे चार सौम्य धक्के जाणवले. एकाच दिवशी चार धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ तथा छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवासजी औंधकर यांनी दिली.
भूकंपाचे धक्के बसले तेव्हा बहुतांश जण झोपेत होते. एकापाठोपाठ एक असे दोन धक्के जाणवले असल्यामुळे सकाळपर्यंत अजून धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भूकंपाची पूर्वकल्पना देणे शक्य नसल्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावे. भूकंपाचे धक्के जाणवताच घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंगोली- नांदेड- परभणी या भागात अनेक नागरिकांनी हा अनुभव घेतला. पहिला धक्का हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे गावाच्या दक्षिणेकडे शिरळी या गावात याचे भूकंप केंद्र होते, यावेळेस भूकंप खोली १० किलोमीटर होती. तर दुसरे दोनही धक्के पांग्रा शिंदे गावाच्या पश्चिम- उत्तरेकडील काकडधाबा गावात यांचे केंद्र होते. यांची खोली १० किलोमीटर नोंदली गेली.
एकाच वेळी चार धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी व वसमत तालुक्यात गेल्या सहा वर्षांत ३७ पेक्षा जास्त सौम्य भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. आज मध्यरात्री ०१:३७ ते ०३:२३ या दोन तासांमध्ये चार सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. एकाच दिवशी चार धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ आहे अशी माहिती ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ तथा छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवासजी औंधकर यांनी दिली.
Avinash Narne : कफ सिरप घातलेली स्मूदी, प्रेयसीला चार फोन; पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर अविनाश नरणे गोत्यात
पहिला धक्का आज मध्यरात्री १.३७ वाजता,
४.६ रिश्टर स्केल,
शिरळी -पांग्रा शिंदे गाव
खोली १० किलोमीटर.
दुसरा धक्का पहाटे मध्यरात्री २.१५ वाजता,
३.६ रिश्टर स्केल,
काकडधाबा गाव,
खोली १० किलोमीटर.
तिसरा धक्का मध्यरात्री २.१७ वाजता,
३.९ रिश्टर स्केल,
काकडधाबा गाव,
खोली १० किलोमीटर.
चौथा धक्का पहाटे ३.२३ मिनिटांनी
४.१ रिश्टर स्केल,
काकडधाबा गाव
खोली १० किलोमीटर.
देशात El Nino चा इशारा असतानाही Maharashtra मध्ये मुसळधार पाऊस कसा? काय म्हणाला शेतकरी?
नागरिकांनी भूकंपाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुका परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरवू नयेत तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जिल्ह्यात आज सकाळी ३ वाजेनंतर भूकंपाचे धक्के जाणवले असून, भूकंपासंदर्भातील कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर अथवा समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहिती केवळ जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि शासनाच्या अधिकृत माध्यमांतूनच प्राप्त करावी. नागरिकांनी शांतता व संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती अथवा नुकसान आढळल्यास तत्काळ स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी केले आहे.
Eknath Khadse : महाजनांचा प्रभाव घटवण्यासाठी केंद्राची नवी चाल? तावडेंशी भेट, घरवापसीच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात…
तसेच, समाजात भीतीचे वातावरण निर्माण होईल अशा प्रकारच्या अफवा किंवा दिशाभूल करणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करणे अथवा पुढे पाठविणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
