• Thu. Jul 9th, 2026
    अभिनेत्री मौशमी चॅटर्जींना दणका, नाशिकच्या निवृत्त डॉक्टरला मानसिक त्रासाची भरपाई द्या, ग्राहक आयोगाचे आदेश

    Nashik News : डॉ. अरुणा वानखेडे यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्या स्वतः स्वागत करण्यासाठी पोहोचल्या नव्हत्या. त्याच कारणातून तसेच अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करून अभिनेत्री मौशमी चॅटर्जी यांनी गोव्यातील कार्यक्रमाला उपस्थित न राहता थेट मुंबई गाठली.

    मौशमी चॅटर्जी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : संपूर्ण मानधन आणि विमान प्रवासासह पंचतारांकित हॉटेलच्या सर्व सुविधा घेऊनही ऐनवेळी कार्यक्रमाला दांडी मारणे प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री मौशमी चॅटर्जी (इंदिरा मुखर्जी) यांना चांगलेच महागात पडले आहे. नाशिकच्या एका ज्येष्ठ सेवानिवृत्त महिला डॉक्टरांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चॅटर्जी यांना नऊ टक्के व्याजासह तीन लाख रुपयांचे मानधन परत करण्याचे आणि मानसिक त्रासापोटी १ लाख २५ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.

    काय आहे प्रकरण?

    नाशिक येथील सेवानिवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा वानखेडे (वय ७४) यांनी ग्राहक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार डॉ. वानखेडे यांच्या वैद्यकीय तुकडीच्या ५५ व्या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन १८ नोव्हेंबर २०२३ रोजी गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये केले होते. या सोहळ्यासाठी त्यांनी अभिनेत्री मौशमी चॅटर्जी यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले.

    चॅटर्जींना मानधनही, अन् व्यवस्थाही

    एका मध्यस्थ महिला एजंटमार्फत चॅटर्जी यांचे मानधन तीन लाख रुपये निश्चित झाले. त्यानुसार डॉ. वानखेडेंनी दोन लाख रुपये ‘आरटीजीएस’द्वारे पाठवले. त्यानंतर एक लाख रुपये रोख रक्कम गोव्यात पोहोचल्यावर दिली होती. याशिवाय अभिनेत्रीच्या अटींनुसार त्यांच्यासह सहाय्यकासाठी मुंबई-गोवा विमानाची तिकिटे आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्थाही केली होती.
    Maharashtra TimesTukaram Mundhe : तुकाराम मुंढे स्वतः याच्या गाडीवर चायनिज खातात; मराठी नाटकाला ताज्या घडामोडींचा संदर्भ, निखिल चव्हाणचा डायलॉग चर्चेत
    यानुसार १७ नोव्हेंबर २०२३ रोजी चॅटर्जी गोव्यात पोहोचल्या. विमानतळावर त्यांचे स्वागत करून उर्वरित मानधन सुपूर्द केले. मात्र, डॉ. वानखेडे यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्या स्वतः स्वागत करण्यासाठी पोहोचल्या नव्हत्या. त्याच कारणातून तसेच अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करून चॅटर्जी यांनी दुसऱ्या दिवशी (१८ नोव्हेंबर) कार्यक्रमाला उपस्थित न राहता थेट मुंबई गाठली.

    देशात El Nino चा इशारा असतानाही Maharashtra मध्ये मुसळधार पाऊस कसा? काय म्हणाला शेतकरी?

    ग्राहक हक्कांचे रक्षण करणारा निर्णय

    वारंवार ई-मेल पाठवूनही मानधन परत न मिळाल्याने डॉ. वानखेडे यांनी नाशिक ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी करताना नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा एस. डोळहारकर यांनी अभिनेत्रीचा ‘हा वैयक्तिक सेवा करार आहे’ असा युक्तिवाद फेटाळला.
    Maharashtra TimesSuyash Tilak : मी व्यवहारी होतो, जगभर फिरलो, पण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष, सुयश टिळकने दिला मनस्वास्थ्य राखण्याचा मंत्र
    न्यायालयाने स्पष्ट केले की, संपूर्ण रक्कम आणि सुविधांचा लाभ घेऊनही कार्यक्रमाला न जाणे ही सेवेतील गंभीर त्रुटी आहे. त्यानुसार तक्रारदाराकडून घेतलेले मानधन नऊ टक्के वार्षिक व्याजासह परत करावे. यांसह डॉक्टरांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल एक लाख रुपये भरपाई द्यावी. तसेच खटल्याच्या खर्चापोटी २५ हजार रुपये स्वतंत्रपणे द्यावेत, असे आदेश दिले. हा निर्णय ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करणारा आणि सेलिब्रिटींच्या व्यावसायिक बेजबाबदारपणाला चाप लावणारा वस्तूपाठ ठरला आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा