• Wed. Jul 8th, 2026
    मातोश्रीवर हायव्होल्टेज बैठक, 24 आमदार आले, पण निष्ठावान नेत्याची दांडी चर्चेत, ठाकरेंकडून महत्त्वाच्या सूचना

    Maharashtra Politics : सचिन अहिर यांनी ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरची ही पक्षाची पहिलीच बैठक होती

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ‘मातोश्री’ येथे बोलावलेल्या पक्षातील आमदारांच्या बैठकीला एक आमदार अनुपस्थित होता. तर उर्वरित १९ विधानसभा आमदार आणि पाचही विधान परिषद सदस्य या बैठकीला हजर असल्याची माहिती आहे.

    परभणीच्या आमदाराची दांडी

    ठाकरेसेनेचे परभणीचे आमदार राहुल पाटील हे उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित होते; कौटुंबिक कार्यक्रमामुळे आपण बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, असे त्यांनी पक्षाला कळवल्याचे समजते. गेल्या आठवड्यात विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर यांनी ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरची ही पक्षाची पहिलीच बैठक होती. सचिन अहिर यांची थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी वर्णी लागली आहे.

    परभणीचे खासदार शिंदेसेनेत

    विशेष म्हणजे शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले आणि त्यांनी शिंदेसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. त्यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांचाही समावेश आहे. परभणीतील खासदाराच्या मागोमाग परभणीचाच आमदारही बैठकीला गैरहजर असल्याने हे कनेक्शन जोडले जात आहे.

    महत्त्वाची बाब ही की राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच २२ जून रोजी उद्धव यांनी उबाठाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला २६ पैकी चार आमदार अनुपस्थित होते. राहुल पाटील हे २२ जूनच्या बैठकीलाही गैरहजरच होते.
    Maharashtra TimesMuskan Jain : प्लीज माझे प्रायव्हेट फोटो डिलीट कर, तरुणीची रडत विनवणी; ऑडिओ क्लीपने अख्खी केस पालटली, युगुलाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

    कोण आहेत राहुल पाटील?

    डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. ते ठाकरे गटातील निष्ठवान नेते म्हणून ओळखले जातात.

    राहुल पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतरही ते ठाकरेंसोबत राहिले. निष्ठेचं फळ म्हणून त्यांना २०२४ मध्ये उमेदवारीही मिळाली आणि जनतेने त्यांना निवडूनही दिलं.

    Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेत ₹1500 ऐवजी ₹2100? PM- EACची शिफारस

    बैठकीत काय झालं?

    राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे; यासंदर्भातील प्रश्न विधिमंडळात अत्यंत आक्रमकपणे आणि पद्धतशीरपणे मांडावेत, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्या.

    सहा खासदारांनी पक्ष सोडणे आणि सचिन अहिर यांनी शिंदेसेनेत प्रवेश करणे यांमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात पक्षाने एकजूट दाखवावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठका घ्याव्यात, अशा सूचनाही उद्धव यांनी आमदार आणि विधान परिषद सदस्यांना दिल्या.
    Maharashtra TimesMumbai News : बाळ गमावलेल्या पालकांना काय वाटत असेल? महापालिका असंवेदनशील कशी? अधिकाऱ्यांचा निर्लज्जपणा! हायकोर्टाचा तीव्र संताप

    ठाकरेंना धक्क्यावर धक्के

    उद्धव ठाकरेंना यंदा पहिला धक्का १४ जून रोजी बसला, जेव्हा त्यांनी बोलावलेल्या बैठकीला लोकसभेचे केवळ चारच खासदार उपस्थित राहिले. बैठकीला गैरहजर राहिलेले पाच खासदार आणि बैठकीला उपस्थित असलेला आणखी एक खासदार नंतर शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले. पक्ष सोडून जाण्याचे हे सत्र रोखण्याच्या हताश प्रयत्नांतून ठाकरे आपल्या पक्षाचे आमदार आणि नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मात्र पक्षातून होणारी ही गळती सुरूच आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा