Maharashtra Politics : सचिन अहिर यांनी ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरची ही पक्षाची पहिलीच बैठक होती
परभणीच्या आमदाराची दांडी
ठाकरेसेनेचे परभणीचे आमदार राहुल पाटील हे उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित होते; कौटुंबिक कार्यक्रमामुळे आपण बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, असे त्यांनी पक्षाला कळवल्याचे समजते. गेल्या आठवड्यात विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर यांनी ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरची ही पक्षाची पहिलीच बैठक होती. सचिन अहिर यांची थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी वर्णी लागली आहे.
परभणीचे खासदार शिंदेसेनेत
विशेष म्हणजे शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले आणि त्यांनी शिंदेसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. त्यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांचाही समावेश आहे. परभणीतील खासदाराच्या मागोमाग परभणीचाच आमदारही बैठकीला गैरहजर असल्याने हे कनेक्शन जोडले जात आहे.
महत्त्वाची बाब ही की राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच २२ जून रोजी उद्धव यांनी उबाठाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला २६ पैकी चार आमदार अनुपस्थित होते. राहुल पाटील हे २२ जूनच्या बैठकीलाही गैरहजरच होते.
Muskan Jain : प्लीज माझे प्रायव्हेट फोटो डिलीट कर, तरुणीची रडत विनवणी; ऑडिओ क्लीपने अख्खी केस पालटली, युगुलाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट
कोण आहेत राहुल पाटील?
डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. ते ठाकरे गटातील निष्ठवान नेते म्हणून ओळखले जातात.
राहुल पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतरही ते ठाकरेंसोबत राहिले. निष्ठेचं फळ म्हणून त्यांना २०२४ मध्ये उमेदवारीही मिळाली आणि जनतेने त्यांना निवडूनही दिलं.
Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेत ₹1500 ऐवजी ₹2100? PM- EACची शिफारस
बैठकीत काय झालं?
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे; यासंदर्भातील प्रश्न विधिमंडळात अत्यंत आक्रमकपणे आणि पद्धतशीरपणे मांडावेत, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्या.
सहा खासदारांनी पक्ष सोडणे आणि सचिन अहिर यांनी शिंदेसेनेत प्रवेश करणे यांमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात पक्षाने एकजूट दाखवावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठका घ्याव्यात, अशा सूचनाही उद्धव यांनी आमदार आणि विधान परिषद सदस्यांना दिल्या.
Mumbai News : बाळ गमावलेल्या पालकांना काय वाटत असेल? महापालिका असंवेदनशील कशी? अधिकाऱ्यांचा निर्लज्जपणा! हायकोर्टाचा तीव्र संताप
ठाकरेंना धक्क्यावर धक्के
उद्धव ठाकरेंना यंदा पहिला धक्का १४ जून रोजी बसला, जेव्हा त्यांनी बोलावलेल्या बैठकीला लोकसभेचे केवळ चारच खासदार उपस्थित राहिले. बैठकीला गैरहजर राहिलेले पाच खासदार आणि बैठकीला उपस्थित असलेला आणखी एक खासदार नंतर शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले. पक्ष सोडून जाण्याचे हे सत्र रोखण्याच्या हताश प्रयत्नांतून ठाकरे आपल्या पक्षाचे आमदार आणि नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मात्र पक्षातून होणारी ही गळती सुरूच आहे.
