Vasai Virar Rain : पाणी साचलंय, पण प्यायला नाही; वसई-विरारवासियांचे ‘पाऊस’हाल, चार्जिंग-वायफाय ठप्प, WFH करणाऱ्यांची कोंडी
वसई-विरार उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या दोन दिवसांपासून केवळ रस्तेच पाण्याखाली आणले नाहीत, तर हजारो कुटुंबांचे आयुष्यही अंधारात ढकलले आहे. सोमवारी सुरू झालेली पूरस्थिती दुसऱ्या दिवशी अधिकच गंभीर झाली. सखल भागात साचलेले पाणी, घरात शिरलेले मैलापाणी आणि सलग तिसऱ्या दिवशीही गायब झालेली वीज यामुळे स्थानिकांचे जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे.
