• Wed. Jul 8th, 2026
    Maharashtra Rain : आकाश निरभ्र होणार, महाराष्ट्रात पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा नवा अंदाज

    महाराष्ट्रात पाऊस ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार बॅटिंग केली. पण आता पाऊस काही दिवस विश्रांती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. असं असलं तरी केवळ विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरश: पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रकोप बघायला मिळाला. हवामान विभागाकडून नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार, नाशिकमध्ये पाऊस पडत आहे. पण वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे नाशिकवरचं ढगफुटीचं संकट हे अकोले आणि पुढे सुरतच्या दिशेला ढकललं गेलं आहे. पुण्यात घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आता हळूहळू राज्यातील पाऊस ओसरणार आहे. केवळ विदर्भात पाऊस सक्रीय राहण्याची शक्यता आहे.

    पालघरला आज रेड तर उद्या यलो अलर्ट

    हवामान विभागाकडून आज पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळाली. यानंतर आता पालघरला पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याला उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पुढचे काही दिवस पावसाचा ग्रीन अलर्ट असणार आहे. त्यामुळे पालघरमध्ये पाऊस ओसरणार असल्याचं चित्र आहे.

    ठाण्यात पाऊस ओसरणार

    ठाणे जिल्ह्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातलेला बघायला मिळाला. सलग पाच दिवस पडलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. पण आता उद्यापासून ठाणे जिल्ह्यात पाऊस ओसरण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज तर उद्यापासून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

    मुंबईतही पाऊस ओसरणार

    मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. पण आता पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत ठराविक ठिकाणी वाऱ्याचा वेग हा 60 ते 70 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे आणि पावसाची शक्यता आहे. पण उद्यापासून मुंबईत पाऊस ओसरणार आहे.

    रायगडला उद्या यलो अलर्ट

    रायगड जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. रायगडला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजदेखील रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रायगडमधील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती आहे. दरम्यान, उद्यापासून पाऊस कमी होणार आहे. रायगडला उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    रत्नागिरीत काय स्थिती?

    रत्नागिरी जिल्ह्याला पुढच्या तीन दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला केवळ आजच्या दिवसासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती?

    धुळे जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण उद्या पावसाची शक्यता कमी आहे. जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण तितका पाऊस नसेल.

    नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण उद्या पावसाची शक्यता कमी आहे. पुण्याच्या घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    कोल्हापूरला यलो अलर्ट

    कोल्हापूरच्या घाट परिसरात आज आणि उद्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर साताऱ्यात घाट परिसरात पुढच्या दोन दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 9 जुलैला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

    अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांना आजसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्याला 9 जुलैलादेखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्याला 9 आणि जुलैला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा