धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे आरक्षणाच्या मागणीवर आजही ठाम आहेत. यापूर्वी सरकारकडून मनधरणी झाल्यानंतर बोऱ्हाडेंनी आपलं उपोषण स्थगित केलेलं. मात्र आरक्षणाची लढाई सुरूच ठेवणार असा पणही त्यांनी यावेळीच केलेला. अशातच पावसाळी अधिवेशनादरम्यान बोऱ्हाडे मुंबईत विधानभवनात आलेले. धनगर सत्ता देऊ शकतात तसंच बेदखलही करू शकतात, असा इशारा त्यांनी दिला. धनगरांपुढे सरकारला झुकावं लागणार, असेही यावेळी बोऱ्हाडे यांनी म्हटले.