• Tue. Jun 30th, 2026
    कांजुरमार्ग-घणसोली-बदलापूर मेट्रोसाठी प्रतीक्षा वाढली, प्रकल्प अहवालात त्रुटी; MMRDA कोणत्या चुका सुधारणार?

    Kanjurmarg to Badlapur Metro: मुंबई मेट्रो लाइन 14चं काम पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. या पूर्वी तयार केलेल्या अहवालात काही त्रुटी आढळल्या असल्यामुळे परत सल्लागार नेमण्याची प्रकिया सुरू झाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाला जोडणाऱ्या सर्वात लांब मेट्रो लाइन 14साठी पुन्हा एकदा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे. आयआयटी मुंबईने यापूर्वीच्या अहवालात काही सुधारणा करण्याचा सल्ला दिल्यानंतर एमएमआरडीएने पुन्हा एकदा प्रस्तावित कॉरिडोरची व्यवहार्यता मूल्यमापनासाठी निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प आणखी काही काळ लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

    43.69 किमी लांब मार्गिका

    मुंबईतील कांजुरमार्ग ते ठाणे जिल्ह्यातील बदलापूरपर्यंत मेट्रो 14चा मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 43.69 किमी लांबीची ही शहरातील सर्वात लांब मेट्रो असेल. मेट्रोचा मार्ग, प्रवासी संख्येचा अंदाज, डिझाइन आणि आर्थिक व्यवहार्यतेमध्ये आयआयटी मुंबईने काही सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय या संपूर्ण परिसरात सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांची नोंद घेऊन या मेट्रोचा मार्ग निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता नवीन सल्लागार नेमून सविस्तर प्रकल्प अहवाल पुन्हा तयार करण्यात येणार आहे.

    Maharashtra TimesMayank Lohar: बोरिवली-पनवेल-मंगळूर… रोशनचा प्लॅन; लोकलमधील घटनेनंतर फरार; शर्टवरील एका ‘लोगो’मुळे पोलिसांच्या ताब्यात

    मेट्रो लाइन 14वर सध्या 24 स्थानकं प्रस्तावित आहेत. कांजुरमार्ग-घणसोली- कल्याण-अंबरनाथ असा या मेट्रोचा मार्ग असेल. मुख्य मुंबई शहराला पूर्व महानगर प्रदेशातील वेगाने वाढणाऱ्या उपनगरांशी जोडण्याच्या उद्दिष्याने ही मेट्रो मार्गिका तयार केली जात आहे. मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बर रेल्वेसह अनेक मेट्रो मार्गांसोबत इंटरचेंज तयार केलेल असतील.

    नवे सल्लागार काय तपासणार?

    नव्या सल्लागारा सात महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे. ई-निविदा प्रक्रियेद्वारे निविदा मागवण्यात आल्या आहे. 7 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे आणि त्यापूर्वी पूर्वतयारीसाठी एमएमआरडीएने बीकेसीमधील मुख्यालयात 3 जुलै रोजी बैठक बोलावली आहे.

    मेट्रो लाइन 14च्या मार्गावर खाडीला पार करणारा 3.25 किमी लांब बोगदा आहे. कांजुरमार्ग येथे एक भुयारी स्थानक देखील असेल. 2019मद्ये नियुक्त केलेल्या कपंनीने व्यवहार्यता अहवाल सादर करण्यात आला असून आयआयटी मुंबईने त्याचा आढावा घेतला. यावेळी अनेक भागांमध्ये सुधारणांची गरज असल्याचं संस्थेनं स्पष्ट केलं. नवीन सल्लागार मार्गावरील बोगदा, उन्नत मार्ग या दोन्ही विभागांचं संरेखन निश्चित करणं, स्थळ, तांत्रिक आणि भौतिक तपासणी करणं, परिसरातील रहदारी, प्रवाशांची संभाव्य संख्या, खर्चाचा अंदाज आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या मॉडेल अंतर्गत हा प्रकल्प राबविला जाऊ शकतो का या सर्व गोष्टींचा तपास करतील.

    Maharashtra TimesMumbai to Navi Mumbai Metro: मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 30 मिनिटांत! गोल्ड लाइनसाठी ‘सिडको’कडून हालचाली सुरू; कुठे असतील स्थानकं?

    कोणत्या प्रकल्पांचा अभ्यास होणार?

    मेट्रो धावेल त्या मार्गावर विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर, प्रस्तावित ऐरोली-कटाई नाका मार्ग, कल्याण रिंग रोड , घणसोली ट्रान्स हार्बर कॉरिडोर आणि कल्याण-बदलापूर पट्ट्यातील अनेक उड्डाणपूल आणि रस्ते प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा आढाव घेऊन अहवाल आणि आराखडा तयार करण्याची गरज आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भविष्यात तयार होणाऱ्या मार्गांच्या अहवालांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासह शिळफाटा ते भिवंडी येथील राजनोळी जंक्शनदरम्या प्रस्तावित 21 किमी उड्डाणपुलाच्या मार्गाचीही अभ्यास केला जाईल. तसचं, मेट्रो लाइन 4, 12 आणि 12 अ सोबत इंटरचेंज तयार करण्याचाही विचार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा