• Thu. Jun 25th, 2026

    Mahim Fort: माहीम किल्ल्याला मिळणार नवी झळाळी! 20 कोटींचा संवर्धन आराखडा; महापालिका-सीमाशुल्क विभागात सामंजस्य करार

    Mahim Fort: माहीम किल्ल्याला मिळणार नवी झळाळी! 20 कोटींचा संवर्धन आराखडा; महापालिका-सीमाशुल्क विभागात सामंजस्य करार

    Mahim Fort: सीमाशुल्क विभागाच्या अखत्यारित असलेल्या या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहेच, शिवाय कस्टम स्टेशन म्हणूनही त्याची वेगळी ओळख आहे.

    माहीम किल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : अरबी समुद्राच्या साक्षीने शतकानुशतके उभा असलेला माहीम किल्ला आता नव्या रूपात मुंबईकरांसमोर येणार आहे. अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि सीमाशुल्क विभागाने गुरुवारी सामंजस्य करार केला. तब्बल २० कोटी रुपयांच्या खर्चातून किल्ल्याचे संवर्धन, पुनरुज्जीवन आणि पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा मार्ग या करारामुळे मोकळा झाला आहे.

    बाराव्या-तेराव्या शतकात राजा बिंबदेव यांच्या वंशजांनी उभारलेला हा किल्ला मुंबईच्या सात बेटांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. काळाच्या ओघात किल्ल्याभोवती अतिक्रमणे वाढली आणि या ऐतिहासिक वास्तूचे अस्तित्व धूसर होत गेले. मात्र गेल्या काही वर्षांत महापालिकेने विशेष मोहीम राबवत येथील २७५ झोपडीधारकांचे पुनर्वसन केले.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis: राजकारण केल्यास तसेच उत्तर मिळेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
    संवर्धनामुळे या वास्तूचा लौकिक अधिक वाढेल, असा विश्वास सीमाशुल्क विभागाचे प्रधान आयुक्त अजयकुमार पांडे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त नितीन तगाडे, विक्रम फडके, महापालिका उपायुक्त प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, सहाय्यक आयुक्त (जी उत्तर विभाग) योगेश देसाई, पुरातन वारसा संवर्धन सल्लागार विकास दिलावरी, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेतील संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. के. के. सांगळे आदी उपस्थित होते.

    Maharashtra TimesPawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर प्रकरणात पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, माफीचा साक्षीदार फितुर घोषित
    पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देणार
    मुंबईच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय असलेल्या माहीम किल्ल्याचे संवर्धन करणे ही महानगरपालिकेसाठी अभिमानाची बाब असल्याचे महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नमूद केले. माहीम किल्ला अतिक्रमणमुक्त करणे व संवर्धन ही दीर्घकालीन प्रक्रिया होती. अनेक अडचणींवर मात करत हे काम पूर्ण झाले असून आता या वास्तूला पर्यटनाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा