पाच दिवसांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनानंतर अखेर सरकारने रविकांत तुपकरांच्या मागण्यांची दखल घेतलीये.त्यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत होता.सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी आले. मागण्यांबाबत मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून रविकांत तुपकरांच्या भेटीला आलोय, सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आहे. पुढील चार-पाच दिवसात बैठक घेवून योग्य निर्णय घेवू असं आश्वासन मंत्री महाजनांनी दिलंय…. त्यांच्या विनंतीनंतर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी आपलं अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं…