• Fri. Jun 5th, 2026
    Kirit Somaiya: विशेष लेखापरीक्षण करा! किरीट सोमय्यांची मागणी; हजारो जन्मदाखल्यांत फेरफार झाल्याचा आरोप

    Kirit Somaiya: सोमय्या यांनी मुंबई, नाशिक आणि नंदुरबार येथील दाखल्यांमधील फेरफाराचा दाखला देत प्रशासकीय कारभारावर बोट ठेवले.

    किरीट सोमय्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: मुंबईत एका वर्षात तब्बल ८७ हजार, नाशिकमध्ये १८ हजार ८३७ जन्मदाखल्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नंदुरबारमध्येही हीच स्थिती आहे. राज्यात जन्मदाखल्यांमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रकरणांत वाढ झाली असून, जन्म-मृत्यू नोंदणी व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी आणि विशेष लेखापरीक्षण करावे,’ अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.

    नाशिक दौऱ्यावर आलेल्या सोमय्या यांनी गुरुवारी (दि. ४) महापालिकेला भेट दिली. यावेळी सोमय्या यांनी आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून जन्म-मृत्यू नोंदणी, दाखल्यांचे वितरण, दुरुस्ती प्रक्रिया आणि डिजिटल नोंदींचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

    Maharashtra TimesVidhan Parishad Election: निवडणुकीतून माघार घेण्यासाठी भाजपकडून कोट्यवधी रुपयांच्या ‘ऑफर्स’; हर्षवर्धन सपकाळांचा गौप्यस्फोट
    मुंबईत एका वर्षात तब्बल ८७ हजार जन्म दाखल्यांमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. नाशिकमध्ये दीड वर्षात १८ हजार ८३७ दाखल्यांमध्ये बदल झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घोळ सुरू आहे. नाशिकमधील १८,८३७ आणि नंदुरबारमधील १,१०० संशयास्पद दाखल्यांची मूळ कागदपत्रांसह सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

    केंद्र सरकारने जन्म-मृत्यू नोंदींमध्ये पारदर्शकता आणि एकसमानता आणण्यासाठी ‘सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम’ अनिवार्य केली आहे. मात्र, राज्यातील अनेक महापालिकांनी २०१६ पासून या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी केली नाही, असा आरोप सोमय्या यांनी केला. ‘सीआरएस’मुळे डिजिटल पडताळणी सोपी होऊन बनावट दाखले आणि अनधिकृत फेरफारांना आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते ॲड. श्याम बडोदे उपस्थित होते.

    Dillip walse Patil यांनी Sharad Pawar यांची भेट घेतली, नेमकं कारण काय?

    …तरीही नंदुरबारमध्ये जन्मदाखले
    वयाच्या ४० ते ५० वर्षांनंतर लोक नाव, आडनाव, जात बदलण्यासाठी अर्ज करत असल्याचे समोर आले आहे. नंदुरबारमध्ये कोणतेही जुने अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध नसताना सुमारे १,१०० जन्मदाखले वितरित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मूळ नोंदींशिवाय हे दाखले कोणत्या आधारावर दिले, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा