• Sun. Jun 7th, 2026
    Prajakt Tanpure: भाजपात जाताच प्राजक्त तनपुरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मंचावरूनच सांगितलं पुढचं मिशन, NCPतील घडामोडींवरही थेट बोलले

    Prajakt tanpure joins bjp: भाजपात प्रवेशानंतर प्राजक्त तनपुरे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. भाजपाने मला संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल, ती पूर्ण क्षमतेने पार पाडेन, असे तनपुरे यांनी सांगितले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. प्राजक्त तनपुरे यांनी पक्षप्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानत त्यांनी हा निर्णय कार्यकर्ते आणि मतदारसंघाच्या विकासासाठी घेतल्याचे सांगितले.

    पक्षप्रवेशानंतर तनपुरे तात्काळ पक्षाच्या कामाला लागले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्राजक्त तनपुरे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचीदेखील उपस्थिती होती.

    विकासकामांची अपेक्षा

    पक्षप्रवेशानंतर बोलताना तनपुरे म्हणाले, “आज राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे आमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.”

    ते पुढे म्हणाले, “माझा मतदारसंघ प्रामुख्याने ग्रामीण भागाचा आहे. तिथे शेती, वीज आणि पाण्याचे अनेक प्रश्न आहेत. सरकारच्या माध्यमातून या प्रश्नांच्या सोडवणुकीला अधिक चालना मिळेल, अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.”

    Maharashtra TimesJayant Patil: प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश धक्कादायक; भाच्याने पवारांची साथ सोडल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, पक्षांतरामागील कारणावरही भाष्य!

    भाजप देईल ती जबाबदारी पार पाडणार

    पक्षाकडू भविष्यात जी जबाबदारी दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वासही तनपुरे यांनी व्यक्त केला. “भारतीय जनता पक्षाने आमचे स्वागत केले आहे. यापुढे पक्ष जी भूमिका आणि जबाबदारी देईल, ती आम्ही पूर्ण क्षमतेने पार पाडू,” असे ते म्हणाले.

    विलिनीकरणाच्या चर्चांबाबतही खुलासा

    पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी इतरही मुद्द्यांवर भाष्य केलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत झालेल्या बैठकीत आपण उपस्थित होतो, याची कबुलीही त्यांनी दिली. “मी एका बैठकीला उपस्थित होतो. त्या बैठकीत काही राजकीय चर्चाही झाल्या. त्या वेळी अजित पवार उपस्थित होते,” असे त्यांनी सांगितले.

    सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा

    पक्षप्रवेशापूर्वी आपण सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याचे तनपुरे यांनी सांगितले. “माझ्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यांच्या सदिच्छा कायम माझ्यासोबत राहतील,” असे ते म्हणाले. तसेच रोहित पवार यांच्याशीही फोनवरून चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

    Maharashtra TimesTukaram Mundhe: विषारी दारुमुळे पुण्यात मृत्यूंची मालिका; तुकाराम मुंढेंनी भेसळीची पाळेमुळे खणून काढली, भिवंडीत मोठी कारवाई!

    जयंत पाटील यांच्यावर म्हणाले..

    आपल्या पक्षप्रवेशाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेचा कोणताही संबंध नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. “ते माझे मामा असले तरी आमच्या दोघांच्या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या राजकीय निर्णयांशी माझ्या पक्षप्रवेशाचा काहीही संबंध नाही,” असे ते म्हणाले.

    राहुरीतील राजकारणात नवी समीकरणे

    प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी हा मोठा धक्का मानला जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा राजकारणावरही या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता आहे, दरम्यान, भाजपमधील एन्ट्रीनंतर आता प्राजक्त तनपुरेंना विधानपरिषदेत संधी मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा