Central Railway: डोंबिवली रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. स्थानकावर पोहोचताना आणि तिथून बाहेर पडताना नागरिकांचा प्रचंड हाल होतात.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
डोंबिवली: मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराचा अखेर विकास होणार आहे. डोंबिवलीकरांचा प्रवास सुखकर होणार असून स्थाकाजवळ राहणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांनाही मोठा फायदा होणार आहे. सॅटिस प्रकल्पांतर्गत डोंबविली स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारली जाणार आहे. यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मिळून स्थानक परिसराची पाहणी सुरू केली आहे.
रिक्षा, वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांचे हाल
उपनगरिय रेल्वेवर सर्वाधिक गर्दी असलेल्या स्थानकांपैकी एक डोंबिवली रेल्वे स्थानक आहे. दररोज हजारो प्रवासी डोंबिवली रेल्वे स्थानकावरून अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर प्रवास करतात. त्यात स्थानक परिसरात रिक्षाचालकांही संख्याही मोठी आहे. या सर्व कारणांमुळे स्थानकाबाहेर नेहमी वाहतूक कोंडी होते. अनियमित पार्किंग व्यवस्थेमुळे स्थानकाबाहेर किंवा रेल्वे पुलाखाली अनेक दुचाकी किंवा रिक्षा पार्क केल्या असतात. त्यात फेरीवाल्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरत नाही. आता सॅटिस प्रकल्पामुळे स्थानकाबाहेर प्रवाशांना चालण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.
Mumbai BEST Bus: ‘बेस्ट’ची कोंडी फोडण्यासाठी नवे नियोजन, दादरमधील बसचे मार्ग बदलणार; प्रवाशांना फटका बसणार
डोंबिवली पूर्व ते पश्चिम पोहोचण्यासाठी एक ‘इंटीग्रेटेड स्टेशन कॉम्प्लेक्स’ बांधले जाणार आहे. केडीएमसीची इमारत, रामनगर पोलिस ठाणे, विष्णुनगर पोलिस ठाणे आणि स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या रिकाम्या जागेचा वापर करून हे स्टेशन कॉम्प्लेक्स बांधण्यात येईल. ही जागा केवळ नागरिकांसाठी राखीव ठेवली जाणार असल्यामुळे वाहनचालक आणि फेरीवाल्यांच्या त्रासापासून सुटका होणार आहे.
कसा होणार विकास?
सॅटिस प्रकल्पामध्ये बहु-स्तरिय पार्किंग सुविधा बांधण्यात येणार आहे. पार्क केलेल्या वाहनांमुळे रस्ता अडवला जाणार नाही. त्यासह पदपथांचं रुंदीकरण केलं जाईल. शिवाय पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजनाही केल्या जातील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानक परिसरातील कोंडी फुटण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी आता ग्राउंड सर्वे सुरू आहे. तो पूर्ण होताच प्रकल्प अहवाल तयार करून बांधकामाला सुरूवात होईल अशी अपेक्षा आहे.
CSMT Station: सीएसएमटी ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; 13 जूनपर्यंत नऊ गाड्यांना ठाणे-दादरमध्येच थांबा, पाहा वेळापत्रक
डोंबिवली शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे लोकल प्रवासीही वाढले आहेत. त्यामुळे स्थानकावरील पायाभूत सुविधांचा विकास करणं आवश्यक आहे. खासदार श्रीकांत शिंदेंनी सतत या प्रकल्पाचा पाठपुरावा करून एमएमआरडीएला काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्दश दिले आहेत. या विषायवर एमएमआरडेचे आयुक्त संजय मुखर्जींसोबत शिंदेंनी अनेक वेळा बैठक घेऊन चर्चा केली होती. या बैठकीदरम्यान शिंदेंनी अधिकाऱ्यांना तातडीने सर्वे सुरू करून कामाला सुरूवात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच निर्देशांनुसार, केडीएमसी आणि एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी पाहणी करण्यास सुरूवात केली आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा