ST Bus: हजारो प्रवासी आणि कर्मचारी वापर करत असलेल्या भिवंडी एसटी डेपोच्या पुनर्बांधणीला अखेर मान्यता मिळाली असून आगारातील 50 वर्षांहून जुन्या इमारतीचाही विकास होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: भिवंडी एसटी स्थानकाच्या पुनर्बाधणीसाठी गृह विभागाने १४ कोटी १८ लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. एसटीच्या ठाणे विभागात असलेल्या भिवंडी बस स्थानकातून रोज २५०हून अधिक बस फेऱ्या होतात. या स्थानकामधून लांब पल्ल्याच्या तसेच स्थानिक मार्गावरील बस धावतात. अन्य आगारांतील एसटी गाड्यांची ये-जा असल्याने या स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी दिसून येते. या स्थानकात फलाट, वाहतूक नियंत्रक कक्ष, स्थानक प्रमुख, आरक्षण कक्ष, पार्सल कार्यालय, चालक-वाहक विश्रांतीगृह, पोलिस कक्ष, प्रसाधनगृह आदी विकासाच्या कामांसाठी १४ कोटी १८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती. सोमवारी काही अटींच्या अधीन राहून या अंदाजपत्रकास गृह विभागाने मान्यता दिली.
अटींमध्ये प्रामुख्याने या कामासाठी संबंधित कार्यकारी अभियंता यांची तांत्रिक मान्यता घेणे, जुने बांधकाम तोडणे आदी बांधकामपूर्व बाबींचा खर्च अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आलेल्या खर्चातून करणे, आदींचा समावेश आहे.
Konkan Railwayवरील गाड्यांच्या वेळा बदलणार; मान्सून वेळापत्रक जाहीर, मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक एक्सप्रेसवर परिणाम
काय-काय बदलणार?
बस स्थानकाची इमारत ८ कोटी ५४ लाख
पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था ४२ लाख ७० हजार
विद्युत व्यवस्था ९३ लाख ९४ हजार
अग्निशमन यंत्रणा १२ लाख २० हजार
रेनवॉटर हार्वेस्टिंग तीन लाख
कुंपण, प्रवेशद्वार ८ लाख ८० हजार
काँक्रीटीकरण ९४ लाख ४० हजार
पाच दशकांहून जूनी इमारत
गेली अनेक महिने भिवंडी येथील एसटी डेपोची स्थिती गंभीर झाली होती. हजारो कर्मचारी दररोज या डेपोमधून प्रवास करत. एसटी डेपोमध्ये वापरत असलेली इमारतीला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वीच धोकादायक घोषित केलं होतं. तरीही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याबद्दल काही करत नव्हतं. त्यामुळे प्रवाशांच्या जीवासाठी धोका निर्माण झाला होता. पण आता पुनर्बांधणीनंतर ही परिस्थिती बदलणार आहे.
भिवंडी एसटी डेपोचं उद्घाटन 20 मार्च, 1972मध्ये करण्यात आलं. त्यानंतर 50हून अधिक वर्षांपासून नागरिक या डेपोमधून प्रवास करत आहे. ही इमारत त्यावेळी बांधण्यात आली होती. गेली पाच दशकं या इमारतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं असल्यामुळे ती जीर्ण झाली. मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, शहापूर, वाडासारख्या अनेक शहरं आणि ग्रमीण भागांसाठी या डेपोमधून बस सुटतात.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा