कोकणवासी दुहेरी कोंडीत! Mumbai-Goa Highwayवर 12 पुलांचं काम रखडलं, 12 तासांचा प्रवास, टोलवसुलीची मात्र घाई
मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील खारपाडापाठोपाठ खांब येथेही टोलवसुली सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना महामार्गावरील प्रवाशांचा वाहतूककोंडीचा जाच रविवारी आणखी वाढला. रायगडमधील माणगाव-इंदापूर आणि रत्नागिरीतील संगमेश्वर परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवासी, पर्यटकांचे हाल झाले. महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोलवसुली सुरू असल्याने प्रवाशांच्या संतापात वाहतूककोंडीने भर टाकली.
