धरणाची एकूण साठवण क्षमता १९०.८९० दशलक्ष घनमीटर असून, सध्या प्रत्यक्षात ३६.४७० दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ १९.११ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पुढील वर्षाच्या नियोजनासाठी जपून वापरणे आवश्यक असल्याने ही कपात लागू करण्यात आली आहे.
राज्यात जनगणनेला धक्का; खासगी विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम देण्यास मनाई
महापालिकेच्या या निर्णयाचा फटका केवळ महापालिका क्षेत्रालाच नाही, तर मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या सिडको नोडमधील खारघर आणि कामोठे या भागांनाही बसणार असून या दोन्ही सिडको क्षेत्रांमध्ये दर शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर, पाण्याचा काटकसरीने वापर करावा व नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जलाशयांतील पाणीसाठा अधिकाधिक काळासाठी उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय तसेच भारतीय हवामान मान्सून विभागाने यंदा एल-निनो आणि ‘आयओडी’ परिस्थितीबाबत व्यक्त केलेला अंदाज या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार ही उपाययोजना करण्यात येत आहे.
Mount Everest Tragedy: शिखर तर गाठलं, पण परतीच्या वाटेवर अनर्थ; दोन भारतीय गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवर सोडला जीव
पाणी बंदचे वेळापत्रक
बेलापूर —-सोमवार व गुरुवार
नेरूळ —-मंगळवार व शनिवार
तुर्भे —-बुधवार व रविवार
वाशी —-गुरुवार व सोमवार
कोपरखैरणे —-मंगळवार व शनिवार
घणसोली —-बुधवार व रविवार
ऐरोली —-शुक्रवार दिघा म.औ.वि.मं. च्या शटडाऊन संभाव्य वेळापत्रकाप्रमाणे
ठाण्यातही कपात
ठाणे : मुंबई महापालिकेने १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या भागांतील पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील हाजुरी, लुईसवाडी, नामदेववाडी, गावदेवी जलकुंभ, टेंभी बंगला जलकुंभ, कोपरी धोबीघाट, कन्हैया नगर जलकुंभ, कोपरी, नौपाडा, पाचपाखाडी; लोकमान्य-सावरकर नगर समितीमधील साईनाथ नगर, शिवाजीनगर, अंबिका नगर; माजीवाडा-मानपाडामधील बाळकुम पाडा, आंबेडकर नगर, गांधीनगर या परिसरात १० टक्केकपात लागू राहणार आहे.
