जगभर इंधन तुटवड्याच्या झळा बसत असताना त्यात भारत देश देखील होरपळतो आहे. अशा संकटजन्य परिस्थितीत देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन बचतीकडे लक्षवेधत स्वतः देखील आपला ताफा कमी करून देशभर इंधन बचतीचा संदेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस हे देखील बुलेट घेऊन विधान भवनात पोहोचल्याचं पाहायला मिळालं होतं.त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्यात शासकीय बैठका ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात, उद्घाटन समारंभ इतर कार्यक्रम टाळावेत, असे आवाहन केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या याच निर्देशांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी जणू केराची टोपली दाखवली आहे.