Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तलवार उपसली आहे. 30 मेपासून आमरण उपोषण सुरु होणार आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
‘आजची गर्दी पाहून मन भरुन आलंय. आज बैठक घेऊन आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहे. आरक्षणाचा मुद्दा अजिबात सोडायचा नाहीय. सरकारला मराठा समाजाला मोठं होऊच द्यायचं नाहीय. मराठा समाजाचा एवढा द्वेष कशासाठी?’, असा सवालही जरांगे यांनी केला आहे. ‘पक्षाच्या बाजूने राहाल तर तुमच्या लेकरांचं वाटोळं होईल. मराठा समाज पक्षाकडे बघत नाही, मराठा समाज बदलला याचा आनंद आहे. मराठा समाज संकटातून मार्ग काढतोय. सरकारकडून प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. आपल्याकडे रुपया नाही म्हणून पैसेवाले आपल्याकडे येत नाही’.
Kolhapur News: जिथं पत्नी अन् दोन मुलांना गमावलं, तिथंच मृत्यूला कवटाळलं; पुण्यातील व्यक्तीची कोल्हापुरात धक्कादायक अखेर
‘समाजासाठी मी जीवाचं रान करायला तयार’
‘मराठा समाज लढला पण हटला नाही. सरकारकडून वारंवार मराठा समाजाची फसवणूक होत आहे. आंदोलनादरम्यान मराठा समाजाने मुंबई जिवंत केली. मी समाजासोबत प्रामाणिक राहिलो, त्याचं फळ मला मिळतंय. आता आंदोलन होणारच’, असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटलांनी घेतला आहे. ‘मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलन करायचं आहे. मराठ्यांनी विचारांनी मुंबई जिवंत केली, मराठा समाजासाठी मी जीवाचं रान करायला तयार आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दोष देत नाही, पण प्रमाणपत्र का रोखले?’ असा सवाल करत ‘गोरगरीब मराठा हुशार आहे हे विसरु नका. कुणबी प्रमाणपत्र फडणवीसांनीच रोखलं’, असं जरांगेंनी म्हटलं आहे.
‘फडणवीसांचा मी विरोधक नाही, पण सत्य मी सांगणारच. पुढील प्रमाणपत्रं का रोखण्यात आली?’, असा सवाल मनोज जरागेंनी केला आहे. तुमच्या 50 पिढ्या आल्या तरी मराठा समाजाचं नुकसान होऊ देणार नाही. कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा आंदोलन तीव्र होणार. आंदोलनाच्या तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या, नाहीतर तुमची सुट्टी नाही. कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांची मनं जिंका. सातारा आणि कोल्हापूर संस्थानचा जीआर का काढला नाही? 1994ला जो जीआर काढला, त्याच धर्तीवर जीआर काढावा. मी माझ्या समाजाशी कधीच बेईमान होणार नाही. खोटं बोलून मी पैसे कमवत नाही, पैसे कमवणारी गँग दुसरी आहे’.
Pune Bishnoi Gang : ‘हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट…’; पुण्यात फर्निचर मॉलवर गोळीबार, लॉरेन्स बिष्णोई गँगचा धुमाकूळ, शुभम लोणकरची FB पोस्ट
‘कितीही डाव टाका, लढाई सोडणार नाही’
‘गरीब मराठा समाजाने मोठ्या विश्वासाने मला जबाबदारी दिली आहे. मराठा समाजाचं कल्याण झालं पाहिजे. मी जे काही सांगतोय ते सत्यच सांगतोय. टीका करायला मी मागेपुढे पाहणार नाही, पण कामापुढे वेळ नाही. एका मंत्र्याने एका संघटनेला दोन कोटी देण्याचं ठरवलंय. जरांगेंविरोधात बोलण्यासाठी कोट्यवधी रुपये देण्याचं ठरवलंय. पण ज्यांना कोट्यवधी देणार होते, तेच माझ्याकडे आले. कितीही झालं तरी जातीसाठी मी लढणार. बेईमानीच्या यादीत जाण्यापेक्षा मराठा समाजाचं कल्याण करा. माझं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण, मराठा समाजासाठी लढतच राहणार. कितीही डाव टाका, लढाई सोडणार नाही’, अशा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
