• Sat. Jun 13th, 2026
    Thane Politics : शिंदेंच्या बालेकिल्यात महायुतीत धुसफूस, महासभेत भाजप-शिवसेना आमनेसामने, जोरदार खडाजंगी, पोलिसांत तक्रार

    ठाणे महापालिकेच्या महासभेत गदारोळाची मालिका कायम राहिली आहे. महासभेत पुन्हा एकदा सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकमेकांना भिडले. तसेच सभागृहाबाहेर एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर भाजप नगरसेवकांनी शिवसेनेच्या नगरसेवकांची पोलीस ठाण्यात तक्रार केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे : ठाणे महापालिकेत सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-भाजप या मित्रपक्षांमध्येच पुन्हा एकदा महासभेत जोरदार गदारोळ झाला. पाच मिनिटांत २३२ विषय शिवसेनेने प्रशासनाच्या साथीने बहुमताच्या जोरावर मंजूर केल्याचा आरोप भाजपने केला. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर येत शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच भाजपने जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याप्रश्नी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. त्यामुळे नेहमीप्रमाणे महासभेतील चर्चेवरून शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांची एकमेकांवर कुरघोडी सुरु असल्याचे दिसून आले.

    ठाणे महापालिकेच्या सलग तिसऱ्या महासभेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमधील वादाची मालिका कायम राहिली. शुक्रवारी झालेल्या या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांच्याकडून एल निनोमुळे भविष्यात होणाऱ्या परिस्थितीबाबत लक्षवेधी सूचना दाखल करण्यात आली होती. या सूचनेवर प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सचिवांना विषय पत्रिकेवरील कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले.

    यावेळी विषयपत्रिकेआधी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संजय वाघुले, नम्रता कोळी, मृणाल पेंडसे यांच्यासह इतर नगरसेवकांनी केली. भाजपचे नगरसेवक विषयपत्रिकेवरील चर्चेसाठी ठाम राहिले. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आपले आसन सोडून सभागृहात येऊन पहिल्याच विषयाला माझा आक्षेप आहे. तो मंजूर करू नये, अशी मागणी केली. मात्र, शिवसेनेने बहुमताच्या जोरावर एक विषय वगळता सर्व विषय मंजूर करून घेतले, असा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला.

    महापौरांच्या आसनासमोर ठिय्या

    या विरोधात भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी सभागृहात शिवसेना नगरसेवक मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांनी अचानक राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली, असाही आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यानंतर महासभेचे कामकाज गुंडाळण्यात आले. सभागृहाचे कामकाज संपले नसतानाच, अचानक राष्ट्रगीत सुरू केल्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान झाला आहे, असा आरोप करीत भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येईल, असा इशारा दिला. तसेच सातत्याने पाच मिनिटांत २०० ते ३०० विषय मंजूर केले जात असल्याच्या पद्धतीला भाजपचा विरोध आहे, असेही भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी नमूद केले.

    नौपाडा पोलिसांना निवेदन

    या गोंधळानंतर भाजपच्या नगरसेवकांनी पाचपाखाडी येथील पालिका मुख्यालयापासून नौपाडा पोलीस ठाण्यापर्यंत चालत जात राष्ट्रगीताच्या अवमान प्रकरणी नौपाडा पोलिसांना निवेदन दिले. हा राष्ट्रगीतासह सभागृहाचा आणि पीठासीन अधिकाऱ्यांचा अवमान झाल्याचे या निवेदनामधून गटनेते मोकाशी यांनी अधोरेखित केले. दरम्यान, अशाप्रकारे सत्तेत असतानाही चुकीचे वागणे हे निंदनीय आहे. आम्ही भाजपला संख्या कमी असतानाही सत्तेत वाटा दिला आहे. मात्र अशप्रकारे चुकीचे वागून ते सर्वांना वेठीस धरत आहे. त्यांची भूमिका कपटी वाटत आहे. अशी भूमिका घेण्यापेक्षा भाजपने सत्तेतून बाहेर पडावे आणि विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी, अशी भूमिका माजी महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी या वादाप्रश्नी मांडली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा