पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच कोकणात अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल-डिझेल संपल्याचे बोर्ड लागले आहेत. सध्या पर्यटनाचा मोठा हंगाम सुरू असताना इंधन तुटवड्याची परिस्थिती निर्माण झालीय. पंतप्रधानांच्या आवाहनावरून अनेकांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. इंधन तुटवडा म्हणजे हे मोदी सरकारचं अपयश असल्याची टीका नागरिकांनी केली. तसेच आधी स्वतःपासून सुरुवात करा, अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला.