Maharashtra Politics : राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना ठेवण्यात आलं असलं तरी त्यांच्या नावासमोर पक्षातील कुठल्याही पदाचा उल्लेख नसल्याने चर्चांना उधाण आलं होतं
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रफुल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष पदावरुन हटवल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे विरुद्ध पार्थ पवार असा सुप्त संघर्ष असल्याच्या चर्चा सुरु असतानाच ही घडामोड समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र त्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांना मध्यरात्री एक वाजता ही तांत्रिक चूक असल्याचं स्पष्टीकरण ‘एक्स’ सोशल मीडिया अकाऊण्टवरुन द्यावं लागलं. परंतु, अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेमकं काय चाललं आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
याआधी, नवनिर्वाचित पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दहा मार्च रोजी दिलेल्या पत्रात प्रफुल पटेल यांच्यासह सुनील तटकरे यांच्याही नावासमोर त्यांच्या पदांचा उल्लेख केला नसल्याने राजकीय वादळ निर्माण झालं होतं. त्यावर पक्षाकडून कुठलं स्पष्टीकरणही देण्यात आलेलं नव्हतं. परंतु, २९ एप्रिलला सुनेत्रा पवार यांनी नवं पत्र देत पटेलांचं राष्ट्रीय कार्याध्यक्षपद काढून घेतल्याचं पाहायला मिळालं.
सुनेत्रा पवारांचं नवं पत्र
२९ एप्रिलला सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी पाठवत असल्याचं म्हटलं होतं. ही यादी अंतिम असल्याचंही पत्रात म्हटलं होतं. CISF Jawan VIDEO : सर, आईला भेटू का पटकन? एअरपोर्टवर तरुणाची CISF अधिकाऱ्यांना विनवणी, खाकी वर्दीतली माणूसकी जागी, घळाघळा रडणाऱ्या माऊलीला लेक बिलगला
पत्रात २२ सदस्यांची नावं
नव्या पत्रात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार, तर कोषाध्यक्ष म्हणून शिवाजीराव गर्जे यांची नावं नमूद करण्यात आली आहेत. २२ सदस्यीय कार्यकारिणीतही राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून पार्थ आणि जय पवार यांचा उल्लेख आहे. पार्थ पवार अणि सुबोध मोहिते हे सरचिटणीस तर जय पवार राष्ट्रीय सचिव अशी पदं आहेत. याशिवाय अविनाश आदिक, सना मलिक, धीरज शर्मा, संजय प्रजापती, राणा रणवीर सिंग, डॉ. रमन प्रीत सिंग, धनंजय शर्मा आणि डॉ. अभिषेक बोके यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
‘सहलीला जायचं विचारलं तर ते कोकणच म्हणायचे’, Sunetra Pawar यांनी अजितदादांची आठवण सांगितली
अजित पवार यांच्या निधनानंतर पटेल-तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टेकओव्हर करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. त्यानंतर पटेल-तटकरे आणि पार्थ पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरु असल्याचंही बोललं जात होतं.
विधान परिषद उमेदवारीवेळीही संघर्ष
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार ठरवण्यासाठी ‘देवगिरी’ बंगल्यावर बैठक झाली होती. परंतु तिकीटवाटपावर खल सुरु असताना पार्थ पवार यांनी संजय काकडेंचे सुपुत्र विक्रम यांच्या सुचवलेल्या नावाला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केला. अखेर बाबा सिद्दीकींचे पुत्र झिशान यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे हा संघर्ष अधोरेखित झाला. अशातच ११ मे रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या तीन पानी पत्रामुळे या दाव्यावर आता शिक्कामोर्तब झालं. Chandranath Rath : बनावट नंबरप्लेट, चेसिस नंबर बदलला, पण टोलनाक्यावर UPI पेमेंट केलं अन् सुवेंदू अधिकारींच्या PA चे मारेकरी सापडले
सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण
राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना ठेवण्यात आलं असलं तरी त्यांच्या नावासमोर पक्षातील कुठल्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे पटेल आणि तटकरे यांची पक्षातील पदं काढून घेतल्याची चर्चा रंगली. परंतु सुनेत्रा पवार यांनी ‘एक्स’वर स्पष्टीकरण दिलं. “माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत एक लेखनिक पातळीवर चूक असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल.” असं म्हटलं आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा